ओमराजेंच्या पाठपुराव्याला यश : ‘उस्मानाबाद रेल्वे स्टेशन’ चे नामकरण अखेर ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’

Spread the love

धाराशिव – खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं असून, अखेर ‘उस्मानाबाद रेल्वे स्टेशन’चं अधिकृत नामकरण ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’ असं करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर भारतीय रेल्वे विभागाने यास अधिकृत मान्यता दिली आहे.

ही केवळ नावाची अदलाबदल नाही, तर धाराशिवच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा दैदिप्यमान विजय आहे, अशा शब्दांत ओमराजेंनी या घडामोडीवर प्रतिक्रिया दिली आहे.

धाराशिवचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पुरातत्त्वीय महत्त्व अधोरेखित करत गेल्या काही वर्षांपासून ‘धाराशिव’ हे नाव बहाल करण्याची मागणी होत होती. विशेषतः ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत आणि रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने यासाठी आवाज उठवला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं असून, स्थानिक जनतेतही या निर्णयाचं जोरदार स्वागत होत आहे.

रेल्वे स्थानकावर लवकरच नव्या नावाचे फलक झळकणार असून, विविध प्रशासकीय स्तरावर आवश्यक ती अद्ययावत प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *