पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेतर्फे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन – भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरला सलाम

Spread the love

धाराशिव – भारतीय सैन्याने अलीकडेच यशस्वीरित्या पार पाडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेद्वारे पाकिस्तानला करारा प्रत्युत्तर देत देशाच्या सुरक्षेची नवी शौर्यगाथा लिहिली आहे. या शूर पराक्रमाचा गौरव करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, शिवसेनेतर्फे धाराशिवमध्ये एक भव्य तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली आहे.

या वेळी परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा रॅली काढण्यात येणार असून या रॅलीमधून देशभक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा व भारतीय सैन्याच्या शौर्याला मानवंदना देण्याचा उद्देश शिवसेनेचा आहे.

ही तिरंगा रॅली २२ मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता जिजाऊ चौक, बार्शी नाका येथून सुरुवात होणार असून, जिजामाता चौक, धर्मवीर संभाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोप होईल. रॅलीत हजारो शिवसैनिक, युवक, महिला, व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केले आहे..

रॅलीच्या माध्यमातून धाराशिव शहरात राष्ट्रप्रेमाची ऊर्जा संचारणार असून, तिरंग्याच्या रंगात रंगलेला प्रत्येक रस्ता भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतीक ठरणार आहे.

  • Related Posts

    सोलापूर रेल्वे विभागातील ३० रेल्वे कर्मचारी आणि ९ विभागांचा गौरव

    Spread the love

    Spread the loveसोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सिद्धेश्वर रेल्वे ऑफिसर्स क्लब ऑडिटोरियम हॉल, सोलापूर येथे ७० वा रेल्वे आठवडा २०२५ कार्यक्रम आयोजित केला होता. या…

    एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ;सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड अनिवार्य-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveमुंबई – : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन, पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस.टी. महामंडळाने ‘नॅशनल कॉमन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *