पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेतर्फे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन – भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरला सलाम

Spread the love

धाराशिव – भारतीय सैन्याने अलीकडेच यशस्वीरित्या पार पाडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेद्वारे पाकिस्तानला करारा प्रत्युत्तर देत देशाच्या सुरक्षेची नवी शौर्यगाथा लिहिली आहे. या शूर पराक्रमाचा गौरव करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, शिवसेनेतर्फे धाराशिवमध्ये एक भव्य तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली आहे.

या वेळी परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा रॅली काढण्यात येणार असून या रॅलीमधून देशभक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा व भारतीय सैन्याच्या शौर्याला मानवंदना देण्याचा उद्देश शिवसेनेचा आहे.

ही तिरंगा रॅली २२ मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता जिजाऊ चौक, बार्शी नाका येथून सुरुवात होणार असून, जिजामाता चौक, धर्मवीर संभाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोप होईल. रॅलीत हजारो शिवसैनिक, युवक, महिला, व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केले आहे..

रॅलीच्या माध्यमातून धाराशिव शहरात राष्ट्रप्रेमाची ऊर्जा संचारणार असून, तिरंग्याच्या रंगात रंगलेला प्रत्येक रस्ता भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतीक ठरणार आहे.

  • Related Posts

    राज्यातील १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंढे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी

    Spread the love

    Spread the loveमुंबई : राज्य शासनाने आज मोठा प्रशासकीय फेरबदल करत १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये कर्तव्यदक्ष आणि धडाडीचे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांचाही समावेश…

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वार्डाची सुरक्षा समिती सदस्यांकडून पाहणी.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे उष्माघात वार्ड पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवण्यात आला आहे. रुग्णांना तातडीने व योग्य उपचार मिळावेत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *