दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीनंतर मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून सत्कार व शुभेच्छा

Spread the love

धाराशिव – भारतीय जनता पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदाची धुरा दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्याकडे सोपवण्यात आली असून, त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. या निवडीबद्दल त्यांचा मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि मनःपूर्वक अभिनंदन केले.

या वेळी बोलताना मल्हार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, “दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या रूपाने पक्षाला एक सक्षम, कार्यतत्पर आणि अनुभवसंपन्न नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्या निवडीमुळे धाराशिव जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक बळकट होईल, असा मला ठाम विश्वास आहे.”

दत्ताभाऊ कुलकर्णी हे अनेक वर्षांपासून पक्षात सक्रिय असून, त्यांनी विविध पदांवर काम करत कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. त्यांच्या संयमी आणि जनसंपर्कक्षम नेतृत्वामुळे भाजपला ग्रामीण भागातही नवसंजीवनी मिळेल, असे मत कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

या सत्कार सोहळ्यास भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण होते आणि भविष्यातील वाटचालीसाठी दत्ताभाऊ कुलकर्णी यांना शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

  • Related Posts

    सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत दत्तात्रय आनंदे यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरव

    Spread the love

    Spread the loveमुंबई – राज्यभरातील पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ आणि उल्लेखनीय सेवेबद्दल ओळखले जाणारे एक नाव म्हणजे श्री. सूर्यकांत दत्तात्रय आनंदे. त्यांच्याच प्रदीर्घ सेवेला आज राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, राष्ट्रपती…

    पत्रकारांनी पोलिसांसाठी मित्र आणि मार्गदर्शक व्हावे पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचे पत्रकारांना आवाहनधाराशिव जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने नूतन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचा सत्कार

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – धाराशिव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून चांगले काम करण्याचा उद्देश ठेवून मी आले असून, यासाठी पत्रकारांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी मित्र आणि मार्गदर्शक बनावे असे आवाहन नवनियुक्त…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *