धाराशिव: स्वराज्याचे रक्षण करणारे, शौर्य, धैर्य आणि बुद्धीमत्ता यांचा अनोखा संगम असलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शाहूराज प्रतिष्ठान यांच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली.
या निमित्ताने महाराजांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, बहुजनांचे नेते धनंजय नाना शिंगाडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष शहर संघटक कडवट मावळा प्रशांत उर्फ बापू साळुंके,धाराशिव जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. जयंतजी जगदाळे, प्राचार्य चव्हाण सर, युवासेना उपजिल्हाप्रमुख विजय राठोड, अॅड. शुभम गाडे, युवासेना तालुकाप्रमुख प्रशांत (तुकाराम) कोळी, आणि संस्थापक अध्यक्ष युवराज तात्या राठोड आदींच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाच्या आयोजनात जयंती अध्यक्ष कृष्णा पाटील, उपाध्यक्ष प्रतीक कदम, सचिव प्रेम रणखांब, मिरवणूक प्रमुख ओम जगताप, तसेच मंडळाचे कार्यकर्ते रोहन नलवडे, महेश चौगुले, श्री भोरे, साईराज कदम, यश कदम, सुनील भोसले, प्रतीक मेंढेकर, सागर पवार, सोहम खांडवे, अरुण राठोड, मिथुन राठोड, सुयोग साळुंखे, रोहन खोत यांचे विशेष योगदान लाभले.
शहरामध्ये महाराजांच्या कार्याची उजळणी करत, त्यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून झाला. शाहूराज प्रतिष्ठानच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, अशा उपक्रमातून नवतरुणांना इतिहासाची आणि स्वाभिमानाची जाणीव होणे आवश्यक आहे, असे मतही यावेळी अनेकांनी व्यक्त केले.