पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तृत्तीयपंथी देवांशी काकडेच्या आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन

Spread the love

धाराशिव – 1 मे महाराष्ट्र स्थापना दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून तृत्तीयपंथी देवांशी काकडेकडून संचलित आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलिस अधिक्षक संजय जाधव, अपर पोलिस अधिक्षक अशफत आमना, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, उपविभागीय अधिकारी अरुणा गायकवाड, समाजकल्याणचे सहायक आयुक्त बाबासाहेब अरवत, तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांच्यासह महसुल विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
आपले सरकार सेवा केंद्रातून नागरिकांना विविध शासकीय योजना, उत्तन्न, जात, रहिवासी, वय,अधिवास व राष्ट्रीयत्व यासह अन्य प्रमाणपत्रे आणि अर्ज प्रक्रिया यासाठी या केंद्रातून मदत करण्यात येणार आहे, जेणेकरुन नागरिकांना सरकारी कार्यालयात वारंवार जावे लागणार नाही. या केंद्रामुळे तृत्तीयपंथी देवांशी काकडे यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

  • Related Posts

    रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तीकीचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे हस्ते प्रकाशन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – देशातील रोजगार,बेरोजगारी आणि असंघटित क्षेत्राच्या आर्थिक स्थितीबाबत अद्ययावत व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत (MoSPI) नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (Periodic…

    १ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक ;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज/मुंबई विशेष वृत्तसेवा:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *