दिव्यांग व्यक्तींना हरित ऊर्जेवरील मोबाईल दुकानांचे होणार मोफत वाटप १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले

Spread the love

धाराशिव, दि.8 दिव्यांग व्यक्तींसाठी स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणारे पर्यावरणस्नेही फिरते दुकान ( मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी योजना लागू केली आहे.या योजनेस सन २०२४-२५ करिता १० जून २०१९ रोजीच्या शासनाने मान्यता देण्यात आली आहे.त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून केली जात आहे.

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या योजनेस राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.ही मागणी लक्षात घेता,गरजू दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्जदार नाव नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.इच्छुक अर्जदार https://register.mshfdc.co.in या पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतात.अर्ज भरण्याची अंतिम मुदत १० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत आहे.

राज्य सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक योजना राबवल्या असल्या तरी,ही योजना विशेष महत्त्वाची ठरणार आहे,कारण ती आर्थिक स्वायत्ततेबरोबरच पर्यावरणस्नेही उपजीविकेचा मार्ग खुला करते.इच्छुक लाभार्थ्यांनी वेळेत अर्ज करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ धाराशिवचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

  • Related Posts

    गडकोट विकास महामंडळासाठी जागर प्रतिष्ठानचा लढा तीव्र; तुळजापूरात किसन पाटील चव्हाण यांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी

    Spread the love

    Spread the loveराज्यातील १२० तालुक्यांतील तहसील कार्यालयांना निवेदन; शासनाने तातडीने निर्णय घ्यावा – इतिहासप्रेमींची मागणी

    अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ( प्रतिनिधी )स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन साजरा करताना आपण त्यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाला स्मरण करतो. पण त्याच संभाजी महाराज यांच्या स्मारकाच काम संथ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *