कळंब शहर अतिक्रमणाच्या विळख्यात: वाहतुकीची कोंडी आणि अपघातांचे वाढते प्रमाण

Spread the love

धाराशिव/कळंब – कळंब शहर अतिक्रमणाच्या समस्येत गुरफटलेले असून, या कारणामुळे शहरातील वाहतुकीचा खोळंबा रोजचाच झाला आहे. वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम सर्रास पाळले जात नाहीत, आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यांवर काही लोकांनी अतिक्रमण करून गाळे उभे केले आहेत आणि ते भाड्याने देऊन आपली मालमत्ता वाढवण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र, यावर प्रशासन आणि पोलीस विभाग हे डोळेझाक करत असल्याचे स्पष्टपणे जाणवते.

अतिक्रमण हटवणे आणि वाहतुकीची समस्या सोडवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. तरीसुद्धा, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. ही समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठवणे गरजेचे आहे.

अशा प्रकारच्या कारभारामुळे कळंब शहरातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तातडीने योग्य पावले उचलावीत, हीच अपेक्षा!

  • Related Posts

    गडकोट विकास महामंडळासाठी जागर प्रतिष्ठानचा लढा तीव्र; तुळजापूरात किसन पाटील चव्हाण यांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी

    Spread the love

    Spread the loveराज्यातील १२० तालुक्यांतील तहसील कार्यालयांना निवेदन; शासनाने तातडीने निर्णय घ्यावा – इतिहासप्रेमींची मागणी

    अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ( प्रतिनिधी )स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन साजरा करताना आपण त्यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाला स्मरण करतो. पण त्याच संभाजी महाराज यांच्या स्मारकाच काम संथ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *