कळंब शहर अतिक्रमणाच्या विळख्यात: वाहतुकीची कोंडी आणि अपघातांचे वाढते प्रमाण

Spread the love

धाराशिव/कळंब – कळंब शहर अतिक्रमणाच्या समस्येत गुरफटलेले असून, या कारणामुळे शहरातील वाहतुकीचा खोळंबा रोजचाच झाला आहे. वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम सर्रास पाळले जात नाहीत, आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यांवर काही लोकांनी अतिक्रमण करून गाळे उभे केले आहेत आणि ते भाड्याने देऊन आपली मालमत्ता वाढवण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र, यावर प्रशासन आणि पोलीस विभाग हे डोळेझाक करत असल्याचे स्पष्टपणे जाणवते.

अतिक्रमण हटवणे आणि वाहतुकीची समस्या सोडवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. तरीसुद्धा, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. ही समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठवणे गरजेचे आहे.

अशा प्रकारच्या कारभारामुळे कळंब शहरातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तातडीने योग्य पावले उचलावीत, हीच अपेक्षा!

  • Related Posts

    जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रयत्नआधार नोंदणीच्या माध्यमातूनमुकबधिर बालकाचे कुटुंब शोधण्यात यश

    Spread the love

    Spread the loveअकोला – : जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि आधार नोंदणी प्रक्रियेचा प्रभावी वापर करून एका मुकबधिर हरविलेल्या बालकाचे कुटुंब शोधण्यात यश आले.बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनात ही…

    फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीकडून उपवर्गीकरण (अबकड) विरोधी मोर्चात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जिल्हाधिकारी यांना निवेदन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : आरक्षण उपवर्गीकरण (अबकड) विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात फुले,शाहू, आंबेडकर उद्यान कृती समितीने सक्रीय सहभाग घेतला.यावेळी समितीच्या वतीने मोर्चात सहभागी झालेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *