कळंब शहर अतिक्रमणाच्या विळख्यात: वाहतुकीची कोंडी आणि अपघातांचे वाढते प्रमाण

Spread the love

धाराशिव/कळंब – कळंब शहर अतिक्रमणाच्या समस्येत गुरफटलेले असून, या कारणामुळे शहरातील वाहतुकीचा खोळंबा रोजचाच झाला आहे. वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम सर्रास पाळले जात नाहीत, आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यांवर काही लोकांनी अतिक्रमण करून गाळे उभे केले आहेत आणि ते भाड्याने देऊन आपली मालमत्ता वाढवण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र, यावर प्रशासन आणि पोलीस विभाग हे डोळेझाक करत असल्याचे स्पष्टपणे जाणवते.

अतिक्रमण हटवणे आणि वाहतुकीची समस्या सोडवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. तरीसुद्धा, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. ही समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठवणे गरजेचे आहे.

अशा प्रकारच्या कारभारामुळे कळंब शहरातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तातडीने योग्य पावले उचलावीत, हीच अपेक्षा!

  • Related Posts

    आपत्ती व्यवस्थापनाला नवी ताकद : पूर,आग आणि बचावकार्यासाठी अत्याधुनिक वाहनेपालकमंत्र्यांनी केले लोकार्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तींचा वाढता धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव अंतर्गत खरेदी करण्यात…

    “माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून धाराशिवला निरोगी,सक्षम आणि आदर्श जिल्हा बनवूपालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

    Spread the love

    Spread the loveआरोग्य संस्थांचा लोकार्पण सोहळा माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यशाळा       १ मे रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आरोग्य संस्थांचे ऑनलाईन लोकार्पण आणि ‘माझं गाव आरोग्य संपन्न…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *