तामलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेटएमआयडीसी संदर्भात मनोज जरांगे यांचा जिल्हाधिकारी यांना फोन

Spread the love

आंतरवली सराटी – तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे होणाऱ्या नियोजित एमआयडीसी संदर्भात शेतकऱ्यांच्या वाहीक बागायती जमीनी बळजबरीने घेत असल्याने तामलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने दि १८ रोजी आंतरवली सराटी जाऊन भेट घेतली व शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या यावर मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी यांना फोन करून याबाबत विचारले.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील नियोजित एमआयडीसी साठी उद्योजक व काही शेतकर्यांची पडीक जमीन सोडून जवळील अनेक शेतकऱ्यांच्या वाहीक व बागायती जमीनी घेण्याचा घाट घातला जात असुश ई मोजणी प्रणालीच्या माध्यमातून मोजणीच्या परस्पर नोंदी घेतल्या व तलाठी सज्जा तामलवाडी यांच्या वतीने शनिवार सुट्टी असताना नोटीस देण्यात येत असल्याने तामलवाडी येथील शेतकर्यांनी दि.१८ रोजी आंतरवली सराटी येथे जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सर्व कागदपत्रे दाखवली व जमीनी वाचवण्याची मागणी केली. यावर मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिव येथील जिल्हाधिकारी साहेबांना फोन करून शेतकर्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास सांगितले. मनोज दादांशी सकारात्मक चर्चा झाल्याने शेतकरी आता पुढील दिशा ठरवणार असल्याचे दिसून येत आहे.

  • Related Posts

    आपत्ती व्यवस्थापनाला नवी ताकद : पूर,आग आणि बचावकार्यासाठी अत्याधुनिक वाहनेपालकमंत्र्यांनी केले लोकार्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तींचा वाढता धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव अंतर्गत खरेदी करण्यात…

    “माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून धाराशिवला निरोगी,सक्षम आणि आदर्श जिल्हा बनवूपालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

    Spread the love

    Spread the loveआरोग्य संस्थांचा लोकार्पण सोहळा माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यशाळा       १ मे रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आरोग्य संस्थांचे ऑनलाईन लोकार्पण आणि ‘माझं गाव आरोग्य संपन्न…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *