आंतरवली सराटी – तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे होणाऱ्या नियोजित एमआयडीसी संदर्भात शेतकऱ्यांच्या वाहीक बागायती जमीनी बळजबरीने घेत असल्याने तामलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने दि १८ रोजी आंतरवली सराटी जाऊन भेट घेतली व शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या यावर मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी यांना फोन करून याबाबत विचारले.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील नियोजित एमआयडीसी साठी उद्योजक व काही शेतकर्यांची पडीक जमीन सोडून जवळील अनेक शेतकऱ्यांच्या वाहीक व बागायती जमीनी घेण्याचा घाट घातला जात असुश ई मोजणी प्रणालीच्या माध्यमातून मोजणीच्या परस्पर नोंदी घेतल्या व तलाठी सज्जा तामलवाडी यांच्या वतीने शनिवार सुट्टी असताना नोटीस देण्यात येत असल्याने तामलवाडी येथील शेतकर्यांनी दि.१८ रोजी आंतरवली सराटी येथे जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सर्व कागदपत्रे दाखवली व जमीनी वाचवण्याची मागणी केली. यावर मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिव येथील जिल्हाधिकारी साहेबांना फोन करून शेतकर्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास सांगितले. मनोज दादांशी सकारात्मक चर्चा झाल्याने शेतकरी आता पुढील दिशा ठरवणार असल्याचे दिसून येत आहे.