तामलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेटएमआयडीसी संदर्भात मनोज जरांगे यांचा जिल्हाधिकारी यांना फोन

Spread the love

आंतरवली सराटी – तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे होणाऱ्या नियोजित एमआयडीसी संदर्भात शेतकऱ्यांच्या वाहीक बागायती जमीनी बळजबरीने घेत असल्याने तामलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने दि १८ रोजी आंतरवली सराटी जाऊन भेट घेतली व शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या यावर मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी यांना फोन करून याबाबत विचारले.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील नियोजित एमआयडीसी साठी उद्योजक व काही शेतकर्यांची पडीक जमीन सोडून जवळील अनेक शेतकऱ्यांच्या वाहीक व बागायती जमीनी घेण्याचा घाट घातला जात असुश ई मोजणी प्रणालीच्या माध्यमातून मोजणीच्या परस्पर नोंदी घेतल्या व तलाठी सज्जा तामलवाडी यांच्या वतीने शनिवार सुट्टी असताना नोटीस देण्यात येत असल्याने तामलवाडी येथील शेतकर्यांनी दि.१८ रोजी आंतरवली सराटी येथे जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सर्व कागदपत्रे दाखवली व जमीनी वाचवण्याची मागणी केली. यावर मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिव येथील जिल्हाधिकारी साहेबांना फोन करून शेतकर्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास सांगितले. मनोज दादांशी सकारात्मक चर्चा झाल्याने शेतकरी आता पुढील दिशा ठरवणार असल्याचे दिसून येत आहे.

  • Related Posts

    गडकोट विकास महामंडळासाठी जागर प्रतिष्ठानचा लढा तीव्र; तुळजापूरात किसन पाटील चव्हाण यांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी

    Spread the love

    Spread the loveराज्यातील १२० तालुक्यांतील तहसील कार्यालयांना निवेदन; शासनाने तातडीने निर्णय घ्यावा – इतिहासप्रेमींची मागणी

    अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ( प्रतिनिधी )स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन साजरा करताना आपण त्यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाला स्मरण करतो. पण त्याच संभाजी महाराज यांच्या स्मारकाच काम संथ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *