बार्शीतील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सेवाकेंद्रात आयोजित पत्रकार स्नेहमिलन

Spread the love

बार्शी – बार्शीतील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सेवाकेंद्रात आयोजित पत्रकार स्नेहमिलन कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. या कार्यक्रमात शहरातील चाळीस पत्रकारांनी गाईडेड मेडिटेशनद्वारे शांती अनुभूती घेतली.

कार्यक्रमात ब्रह्माकुमारी सेवाकेंद्राच्या संचालिका संगीताबहनजी आणि प्रेरक वक्त्या अनितादीदी करवा यांनी जीवनातील संयम, सकारात्मक विचार, आणि आत्मचिंतनाविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी राजयोग अभ्यासक्रमाच्या महत्त्वावरही भर दिला, ज्यामुळे हजारो लोक मानसिक शांती आणि सकारात्मकता अनुभवत आहेत.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे निर्देशित ध्यानाद्वारे शांतीचा अनुभव देणे. मान्यवरांचे स्वागत गुलाबपुष्प आणि ईश्वरीय भेटवस्तूंनी करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रणोतीबहन कोकाटे यांनी केले, तर अजितदादा कुंकूलोळ यांच्या मार्गदर्शनाखाली धीरज शेळके यांनी आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

हा उपक्रम पत्रकारांसाठी मानसिक ताजेपणा आणि शांतीचा अनुभव देणारा ठरला.

  • Related Posts

    गडकोट विकास महामंडळासाठी जागर प्रतिष्ठानचा लढा तीव्र; तुळजापूरात किसन पाटील चव्हाण यांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी

    Spread the love

    Spread the loveराज्यातील १२० तालुक्यांतील तहसील कार्यालयांना निवेदन; शासनाने तातडीने निर्णय घ्यावा – इतिहासप्रेमींची मागणी

    अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ( प्रतिनिधी )स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन साजरा करताना आपण त्यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाला स्मरण करतो. पण त्याच संभाजी महाराज यांच्या स्मारकाच काम संथ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *