ढोकीत वीज गायब, संक्रांतीचा उत्साह गडबडीत, महिलांचा सवाल – ‘याला जबाबदार कोण?’

Spread the love

ढोकी आणि परिसरात मकर संक्रांतीच्या दिवशी एक आगळावेगळा “खास कार्यक्रम” पाहायला मिळाला. हा कार्यक्रम होता – विजेच्या खेळखंडोबाचा! सकाळी दहा वाजता गायब झालेली वीज दिवसभर गायबच राहिली, आणि गावात अंधाराचे साम्राज्य पसरले.

वाखरवाडीच्या मारुती मंदिर, विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात हळदी-कुंकवाचा कार्यक्रम सुरू असताना अचानक वीज गायब झाली, आणि महिलांनी अंधारातच कार्यक्रम पार पाडला. “सणाचा उत्साह नेमका कुणाच्या वीज योजनेत हरवला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मंदिराचा अंधार पाहून काहींनी थेट दिवे लावण्याचा विचार केला, तर काहींनी “मोबाईल फ्लॅशलाइट”वरच समाधान मानले.

याला कारण विचारण्यासाठी महिलांनी थेट एमएससीबीचा संपर्क साधला. पण, एमएससीबीच्या कार्यालयाकडून मिळालेले उत्तर म्हणजे “डोळा मारला आणि फोन ठेवा.”

गावातील एका चतुर महिलेने उपरोधात्मक टिप्पणी केली, “एमएससीबीचे हे ‘सण स्पेशल’ आहे का? का वीज गेल्यावर आम्हाला ‘साक्षात अंधाराचा’ अनुभव देऊन सांस्कृतिक पर्यटन घडवायचं आहे?”

विजेचा खेळखंडोबा कधी संपणार? की सणासुदीला हीच अंधाराची साथ पुढेही कायम राहणार? असा सवाल सध्या गावकरी विचारत आहेत.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *