ढोकीत वीज गायब, संक्रांतीचा उत्साह गडबडीत, महिलांचा सवाल – ‘याला जबाबदार कोण?’

Spread the love

ढोकी आणि परिसरात मकर संक्रांतीच्या दिवशी एक आगळावेगळा “खास कार्यक्रम” पाहायला मिळाला. हा कार्यक्रम होता – विजेच्या खेळखंडोबाचा! सकाळी दहा वाजता गायब झालेली वीज दिवसभर गायबच राहिली, आणि गावात अंधाराचे साम्राज्य पसरले.

वाखरवाडीच्या मारुती मंदिर, विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात हळदी-कुंकवाचा कार्यक्रम सुरू असताना अचानक वीज गायब झाली, आणि महिलांनी अंधारातच कार्यक्रम पार पाडला. “सणाचा उत्साह नेमका कुणाच्या वीज योजनेत हरवला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मंदिराचा अंधार पाहून काहींनी थेट दिवे लावण्याचा विचार केला, तर काहींनी “मोबाईल फ्लॅशलाइट”वरच समाधान मानले.

याला कारण विचारण्यासाठी महिलांनी थेट एमएससीबीचा संपर्क साधला. पण, एमएससीबीच्या कार्यालयाकडून मिळालेले उत्तर म्हणजे “डोळा मारला आणि फोन ठेवा.”

गावातील एका चतुर महिलेने उपरोधात्मक टिप्पणी केली, “एमएससीबीचे हे ‘सण स्पेशल’ आहे का? का वीज गेल्यावर आम्हाला ‘साक्षात अंधाराचा’ अनुभव देऊन सांस्कृतिक पर्यटन घडवायचं आहे?”

विजेचा खेळखंडोबा कधी संपणार? की सणासुदीला हीच अंधाराची साथ पुढेही कायम राहणार? असा सवाल सध्या गावकरी विचारत आहेत.

  • Related Posts

    धाराशिवच्या वैभवात भर! , शहरात साकारणार ८९.७६ कोटींचे भव्य सहा मजली जिल्हा न्यायालय , सहा मजले, १६ कोर्ट आणि प्रशस्त सभागृहाचा समावेश : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव -: आपल्या धाराशिवचा कायापालट होत आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या धाराशिव शहराच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. जिल्ह्याच्या वाढत्या विस्ताराचा आणि नागरिकांच्या सोयीसुविधांचा विचार…

    शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी शिबीराचे यशस्वी आयोजन करा

    Spread the love

    Spread the loveजिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार धाराशिव – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या वतीने आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिरात प्रत्येक विभागाने आपल्या शासकीय योजनांची सविस्तर माहिती देणारे बॅनर्स,फ्लेक्स,पॅम्प्लेट्स आदींसह स्वतंत्र स्टॉल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *