रस्ता सुरक्षा अभियान २०२५

Spread the love

“परवाह” उपक्रमातंर्गत विविध
जनजागृती कार्यक्रम

धाराशिव – रस्ता सुरक्षा अभियान २०२५ “परवाह” उपक्रमातंर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय धाराशिव यांनी १ ते ३१ जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

चोराखळी साखर कारखाना येथे ट्रॅक्टर ट्रेलर व बैलगाडीला रेफलेक्टर लावण्यात आले.यावेळी मोटर वाहन निरीक्षक मारूती चौगले यांनी रिफ्लेक्टरचे फायदे याबाबत उपस्थित वाहन चालकांना मार्गदर्शन केले. येडशी टोलनोका या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक मारूती चौगले यांनी वाहन चालकांना रस्ता सुरक्षेबाबत प्रबोधन केले.तसेच तेथे बॅनर प्रदर्शित करून माहितीपत्रके वितरीत करण्यात आली.
योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्यासाठी आलेल्या वाहन चालकांना ब्रेक टेस्ट ट्रॅकवर मोटार वाहन निरीक्षक श्री एस एस बंग यांनी वाहन चालकांना वाहतूक चिन्हाबाबत ओळख करून देण्यात आली व वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याविषयी समजावून त्यांना शपथ देण्यात आली.तसेच दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करणे, सीट बेल्ट लावणे,मद्यपान करून वाहन चालवू नये,तसेच रस्त्यावर अपघात कसे कमी होतील याबाबत मार्गदर्शन वाहन चालकांना करण्यात आले व माहिती पत्रके वाटप करण्यात आली.रस्ता सुरक्षा अभियान २०२५ “परवाह” अंतर्गत ११ जानेवारी रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या धाराशिव आगारात येथे रस्ता सुरक्षा अभियानाचे कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. मोटार वाहन निरीक्षक प्रशांत भांगे यांनी उपस्थित असलेले वाहन चालक, वाहक व कर्मशाळा मॅकेनिक यांना वेगावर नियंत्रण ठेवावे, मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याविषयी समजावून अपघात कसे कमी करता येतील त्याबाबत चालकांना रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन करण्यात आले.माहिती पत्रके वाटप करण्यात आली.यावेळी बोधले,वाहन चालक खराडे उपस्थित होते.

रस्ता सुरक्षा अभियान २०२५ “परवाह” अंतर्गत ११ जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र.६५ वर असुरक्षित (Vulnerable spots) ठिकाणाची पाहणी मोटार वाहन निरीक्षक महेश रायबान यांनी करून परिसरातील नागरिकांना असुरक्षित ठिकाणी वाहने चालवीत असताना सुरक्षिततेच्या उपायांचा अवलंब करणेबाबत मार्गदर्शन केले.तसेच हेल्मेट वापरणेचे व सीट बेल्ट लावण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.माहिती पुस्तकांचे वाटप करण्यात आले.यावेळी सहायक मोटर वाहन निरीक्षक संजय नकाते व क्षीरसागर तसेच वाहन चालक उपस्थित होते.

  • Related Posts

    आपत्ती व्यवस्थापनाला नवी ताकद : पूर,आग आणि बचावकार्यासाठी अत्याधुनिक वाहनेपालकमंत्र्यांनी केले लोकार्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तींचा वाढता धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव अंतर्गत खरेदी करण्यात…

    “माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून धाराशिवला निरोगी,सक्षम आणि आदर्श जिल्हा बनवूपालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

    Spread the love

    Spread the loveआरोग्य संस्थांचा लोकार्पण सोहळा माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यशाळा       १ मे रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आरोग्य संस्थांचे ऑनलाईन लोकार्पण आणि ‘माझं गाव आरोग्य संपन्न…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *