11 जानेवारी रोजी राज्यभरात ‘मी ज्ञानी होणार’ सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन

Spread the love

धाराशिव, ता. कळंब:- राजर्षी शाहू सामाजिक संस्था खोंदला, ता. कळंब, जि. धाराशिव यांच्या वतीने “मी ज्ञानी होणार” हा सामान्य ज्ञानावर आधारित उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित हा उपक्रम राज्यातील सुमारे 300 शाळांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे.

या उपक्रमांतर्गत दररोज व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाच सामान्य ज्ञान प्रश्न शाळांना पाठवले जातात. हे प्रश्न शाळेच्या दर्शनी फलकावर लिहिले जातात, आणि विद्यार्थी त्यांची नोंद वहीमध्ये करून घेतात. दुसऱ्या दिवशी परिपाठात या प्रश्नांची उजळणी केली जाते. याशिवाय, दर महिन्याला संस्थेच्या पुरवलेल्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे सराव परीक्षा घेतली जाते.

या उपक्रमामुळे विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय, शिष्यवृत्ती परीक्षा, सैनिकी स्कूल परीक्षा यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करू शकत आहेत. या उपक्रमातील अंतिम परीक्षा 11 जानेवारी 2025 रोजी होणार असून, राज्यभरातील सुमारे 20,000 विद्यार्थी यात सहभागी होतील.

अंतिम परीक्षेत प्रत्येक शाळेतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच, शाळांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. राज्यस्तरीय परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम 30 विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत 501 रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

“मी ज्ञानी होणार” उपक्रमाने शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या असून शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्येही याबाबत मोठा उत्साह आहे.

  • Related Posts

    ‘हरित धाराशिव’ची जय्यत तयारी ; सामाजिक वनीकरण विभागाकडून ३५ लाखांहून अधिक रोपांची निर्मितीजिल्हाधिकारी कीर्तीकुमार पूजार यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १५ जूनपासून शासकीय दरात रोपे उपलब्ध

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्याला अधिक हिरवेगार, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने नेण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘हरित धाराशिव अभियान २०२६’ ची तयारी अंतिम टप्प्यात…

    व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनांच्या रांगाच रांगा , महामार्गावर अपघात झाल्यास कोण जबाबदार

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : शहरा नजीक असलेल्या समाधान हॉटेल जवळील महानगर गॅस पंप यांच्या मिसाळ नियोजनाचा फटका बाहेरगावच्या भाविकांना बसण्याची शक्यता असून भाविकांच्या वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *