11 जानेवारी रोजी राज्यभरात ‘मी ज्ञानी होणार’ सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन

Spread the love

धाराशिव, ता. कळंब:- राजर्षी शाहू सामाजिक संस्था खोंदला, ता. कळंब, जि. धाराशिव यांच्या वतीने “मी ज्ञानी होणार” हा सामान्य ज्ञानावर आधारित उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित हा उपक्रम राज्यातील सुमारे 300 शाळांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे.

या उपक्रमांतर्गत दररोज व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाच सामान्य ज्ञान प्रश्न शाळांना पाठवले जातात. हे प्रश्न शाळेच्या दर्शनी फलकावर लिहिले जातात, आणि विद्यार्थी त्यांची नोंद वहीमध्ये करून घेतात. दुसऱ्या दिवशी परिपाठात या प्रश्नांची उजळणी केली जाते. याशिवाय, दर महिन्याला संस्थेच्या पुरवलेल्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे सराव परीक्षा घेतली जाते.

या उपक्रमामुळे विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय, शिष्यवृत्ती परीक्षा, सैनिकी स्कूल परीक्षा यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करू शकत आहेत. या उपक्रमातील अंतिम परीक्षा 11 जानेवारी 2025 रोजी होणार असून, राज्यभरातील सुमारे 20,000 विद्यार्थी यात सहभागी होतील.

अंतिम परीक्षेत प्रत्येक शाळेतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच, शाळांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. राज्यस्तरीय परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम 30 विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत 501 रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

“मी ज्ञानी होणार” उपक्रमाने शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या असून शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्येही याबाबत मोठा उत्साह आहे.

  • Related Posts

    सोयाबीनवरील शंखी गोगलगाय, पैसा/वाणी किडीचा वाढता प्रादुर्भाव ; सामूहिक नियंत्रणासाठी कृषी विभागाचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – चालू खरीप हंगामात मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी व उगवण पूर्ण झाली आहे.मात्र, सध्या जिल्ह्यातील काही भागांत शंखी गोगलगाय तसेच पैसा/वाणी (Millipede) किडीचा…

    ‘पावसाचा प्रत्येक थेंब पिकासाठी वापरा’ ; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बीबीएफ यंत्र चालवत केली सोयाबीन पेरणी,तूरही टोकण पद्धतीने लावली

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – बदलते हवामान,कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड… अशा अनिश्चित परिस्थितीतही सोयाबीनचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रुंद सरी-वरंबा (BBF) तंत्रज्ञान हा सर्वोत्तम पर्याय असल्याचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *