जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी केली विविध कार्यालयातील स्वच्छतागृहांची व नागरिकांच्या सुविधांची पाहणी

Spread the love

सात कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी

धाराशिव –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे ( ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित केला आहे.या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे यांनी आज ८ जानेवारी रोजी धाराशिव येथील विविध कार्यालयांना भेटी दिल्या.

यावेळी डॉ.ओम्बासे यांनी विविध कार्यालयाच्या कार्यालय प्रमुखांना येत्या शंभर दिवसात प्राधान्याने करावयाची कामाबाबत सूचना दिल्या.या सूचनांवर काय कार्यवाही केली याबाबत येत्या १५ एप्रिल २०२५ रोजी आढावा मुख्‍यमंत्री फडणवीस यांच्याकडून घेतला जाणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ.ओंम्बासे यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांना, पशुसंर्वधन उपायुक्त कार्यालयास,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय,जिल्हा परिषदेतील सर्वच विभाग आणि नगर परिषदेला भेट दिली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक गणेश बारगजे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेषेराव चव्हाण,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

शासकीय कार्यालयांची स्वच्छता करा, अनावश्यक कागदपत्रे काढून टाका,खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करावीत.शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा,प्रसाधनगृह कायम स्वच्छ राहतील याकडे लक्ष दयावे. असे निर्देश डॉ.ओंबासे यांनी दिले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अचानक भेटी होतील,त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर (ईज ऑफ लिव्हिंग) व्हावे यासाठी किमान दोन सुधारणा,नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबविण्यात यावेत.प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल,याचा प्रयत्न करावा.अधिकारी नागरिकांसाठी कार्यालयात कधी उपलब्ध असतील याची माहिती फलकावर नमूद करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील विविध महत्त्वाचे कार्यक्रम आणि योजनांना भेटी दिल्या पाहिजेत. तसेच तालुका,गावपातळीवर भेटी झाल्याच पाहिजेत.शाळा,अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या पाहिजे.यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात यावेत,अशा सूचना डॉ. ओंबासे यांनी दिल्या.

  • Related Posts

    आपत्ती व्यवस्थापनाला नवी ताकद : पूर,आग आणि बचावकार्यासाठी अत्याधुनिक वाहनेपालकमंत्र्यांनी केले लोकार्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तींचा वाढता धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव अंतर्गत खरेदी करण्यात…

    “माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून धाराशिवला निरोगी,सक्षम आणि आदर्श जिल्हा बनवूपालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

    Spread the love

    Spread the loveआरोग्य संस्थांचा लोकार्पण सोहळा माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यशाळा       १ मे रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आरोग्य संस्थांचे ऑनलाईन लोकार्पण आणि ‘माझं गाव आरोग्य संपन्न…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *