परळी वैजनाथ येथील ‘अखिल भारतीय महापशुधन एक्स्पो २०२६’ च्या लोगोचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते अनावरण

Spread the love

धाराशिव – महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत परळी वैजनाथ (जिल्हा बीड) येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक ‘अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो, २०२६’ या प्रदर्शनाच्या लोगोचे अनावरण आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याधरण कडवकर, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.पुंडलिक गोडसे,जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) डॉ.धनंजय महाजन तसेच पशुधन विकास अधिकारी डॉ. वैभव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

लोगो अनावरणानंतर संवाद साधताना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार म्हणाले की,पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे.परळी वैजनाथ येथे होणारे हे महाप्रदर्शन देशातील जातीवंतy पशुधन व आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम ठरणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी व पशुपालकांना दुग्धव्यवसायातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान एका छताखाली पाहण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालक, तरुण उद्योजक व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनास भेट देऊन आपले ज्ञान व उत्पन्न वाढवावे.

प्रदर्शनाबाबत अधिक माहिती देताना जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) डॉ.धनंजय महाजन यांनी सांगितले की,या महा एक्स्पोमध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील जातीवंत गायी,म्हशी,शेळ्या-मेंढ्या तसेच विविध पक्षी प्रजातींचे दर्शन घडणार आहे. यासोबतच आधुनिक डेअरी फार्मिंग,चारा व्यवस्थापन,प्रक्रिया उद्योगांचे भव्य स्टॉल्स,पशुधन आरोग्य,लसीकरण व वैज्ञानिक संगोपनावर तज्ज्ञ पशुवैद्यकांची विशेष व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

लोगो अनावरणानंतर संपूर्ण जिल्ह्यात या प्रदर्शनाची व्यापक प्रसिद्धी मोहीम राबविण्यात येणार असून,सर्व पशुवैद्यकीय संस्था,पंचायत समित्या व सार्वजनिक ठिकाणी बॅनर-पोस्टर्सद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून घरपोच माहिती देण्याचेही नियोजन विभागाने केले आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व पशुपालक,शेतकरी व उद्योजकांनी ‘महा पशुधन एक्स्पो २०२६’ मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *