मतदानाच्या दिवशी शांतता राखण्यासाठी जिल्ह्यातील १५ आठवडी बाजार बंद

Spread the love

धाराशिव – जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ अनुषंगाने मतदान प्रक्रिया शांततेत,निर्भय व सुरळीत पार पडावी,या उद्देशाने जिल्ह्यातील ६ तालुक्यातील १५ आठवडी बाजार ७ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील धाराशिव,तुळजापूर,उमरगा,लोहारा, भूम,परंडा,कळंब व वाशी या पंचायत समित्यांमध्ये मतदान होणार आहे.

मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या आदेशानुसार धाराशिव तालुक्यातील पाडोळी (आ.), जागजी,बामणी; तुळजापूर तालुक्यातील निलेगाव,जळकोट,आरळी (बुद्रुक); उमरगा तालुक्यातील तुरोरी,समुद्राळ, केसर जवळगा;भूम तालुक्यातील ईट; कळंब तालुक्यातील मंगरुळ,नायगाव, पिंपळगाव (कोठावळा); तसेच वाशी तालुक्यातील तेरखेडा व बावी या १५ गावांतील आठवडी बाजार मतदानाच्या दिवशी भरविण्यात येणार नाहीत.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,शांततापूर्ण व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *