माहिती आयोगात दाखल प्रकरणांचा गतीने निपटारा

Spread the love

छत्रपती संभाजीनगर खंडपीठाची उल्लेखनीय कामगिरी

छत्रपती संभाजीनगर -: राज्य माहिती आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे. सन 2024 मध्ये खंडपीठाने 14 हजार 1 द्वितीय अपिले निकाली काढली असून, 2025 मध्ये 10 हजार 783 द्वितीय अपिलांचा यशस्वी निपटारा करण्यात आला आहे.
आयोगाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या निपटाऱ्याच्या प्रमाणात जवळपास दहापटीने वाढ झाली असून, द्वितीय अपिलांच्या प्रलंबिततेत सुमारे 55 टक्क्यांची लक्षणीय घट झाली आहे.

राज्य माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांच्या प्रभावी प्रशासकीय नियोजनामुळे आणि सातत्यपूर्ण कार्यपद्धतीमुळे ही कामगिरी शक्य झाली आहे. तक्रार निवारणात 2025 मध्ये 10 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. 2024 अखेरीस प्रलंबित असलेल्या 165 तक्रारींची संख्या डिसेंबर 2025 अखेर 85 वर आली असून, त्यामुळे प्रलंबित तक्रारींमध्ये 51 टक्के घट झाली आहे.

द्वितीय अपिलांच्या प्रलंबिततेतही मोठी घट झाली आहे. 2024 अखेरीस 8 हजार 699 द्वितीय अपिले प्रलंबित होती. ती संख्या डिसेंबर 2025 अखेर 3 हजार 946 इतकी झाली असून, प्रलंबित अपिलांच्या प्रमाणात सुमारे 55 टक्के घट झाल्याचे स्पष्ट होते.
राज्य माहिती आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाची ही कामगिरी माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीस बळ देणारी ठरली आहे.

प्रतिक्रिया
राज्य माहिती आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामार्फत प्रकरणांचा जलद व पारदर्शक निपटारा करण्यावर भर देण्यात आला आहे. नियोजनबद्ध कामकाज, सुनावणीतील शिस्त आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे प्रलंबित अपिले व तक्रारींच्या निपटाऱ्यात लक्षणीय प्रगती साधता आली आहे.
नागरिकांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत वेळेत न्याय मिळावा, हाच आयोगाचा मुख्य उद्देश आहे. भविष्यातही प्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील तसेच माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी अधिक मजबूत करण्यात येईल,” प्रकाश इंदलकर
राज्य माहिती आयुक्त

  • Related Posts

    आपत्ती व्यवस्थापनाला नवी ताकद : पूर,आग आणि बचावकार्यासाठी अत्याधुनिक वाहनेपालकमंत्र्यांनी केले लोकार्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तींचा वाढता धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव अंतर्गत खरेदी करण्यात…

    “माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून धाराशिवला निरोगी,सक्षम आणि आदर्श जिल्हा बनवूपालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

    Spread the love

    Spread the loveआरोग्य संस्थांचा लोकार्पण सोहळा माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यशाळा       १ मे रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आरोग्य संस्थांचे ऑनलाईन लोकार्पण आणि ‘माझं गाव आरोग्य संपन्न…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *