सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आपत्ती निवारण मंत्री गिरीष महाजन

Spread the love

पुरबधित चिंचपूर (ढगे) व वागेगव्हाण शेतशिवाराची केली पाहणी

धाराशिव – जिल्ह्यातील काही भागात २१ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे व त्यामुळे आलेल्या पुरामुळे शेतपिकांचे व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर कधीही आली नव्हती.शेतकरी आज अडचणीत सापडला असताना सरकार भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही आपत्ती निवारण व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

आज जिल्ह्यातील भूम तालुक्यातील चिंचपूर (ढगे) गावाजवळील शेतकरी गणेश मोरे यांच्या शेतात अतिवृष्टी व पुराने नुकसान झालेल्या पिक नुकसानीची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी श्री.महाजन बोलत होते.यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक रितू खोखर,भूमचे उपविभागीय अधिकारी श्री.डोंगरे,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप सेंगलवार,जलसंपदाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.भंडे,प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.आसलकर,तहसीलदार जयंत पाटील यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्री.महाजन पुढे म्हणाले,मोठ्या प्रमाणात जमिनी खरडून गेल्या आहेत.विहिरी क्षतीग्रस्त झाल्या आहेत,नुकसानीची मदत करण्यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.मुख्यमंत्री फडणवीस यांना देखील जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची जाणीव आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नक्की मदत करण्यात येईल.असे त्यांनी सांगितले.

परंडा तालुक्यातील वागेगव्हाण गावाला श्री.महाजन यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.तेथून जवळच असलेल्या थोरबोलेवस्ती आणि जगतापवस्ती येथून एनडीआरएफच्या पथकाने सुखरूप सुटका केलेल्या नागरिकांशी देखील त्यांनी संवाद साधला व सध्या या वस्तीत अडकून पडलेल्या नागरिकांशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांना धीर दिला.उदया सकाळी आपल्याला हेलिकॉप्टरच्या मदतीने सुखरूप आणण्यात येईल.असे त्यांना सांगितले.तसेच त्यांनी एनडीआरएफच्या जवानांसोबत सुरू असलेल्या बचावकार्याबाबत चर्चा करून माहिती घेतली.

  • Related Posts

    श्री गजानन महाराज पालखीचे तुळजापूर येथे आगमन; मा. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री कीर्ती किरण पुजार यांनी सपत्नीक केले स्वागत

    Spread the love

    Spread the loveश्री क्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री गजानन महाराज पालखीचे आज श्रीक्षेत्र तुळजापूर येथे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. यावेळी मा. जिल्हाधिकारी धाराशिव तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे…

    आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात मांस-मटण विक्रीवर १५ दिवस बंदी; प्रशासनाचे कडक आदेश

    Spread the love

    Spread the loveपंढरपूर – : आषाढी शुद्ध एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात १५ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मांस, मटण, मासे विक्री, प्राणी कत्तल तसेच मांसजन्य पदार्थांच्या विक्रीस मनाई…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *