राज्यातील तंटामुक्ति समित्या अभिश्राप की वरदान ??

Spread the love

मांडवी – राज्यात महात्मा गांधी तंटामुक्ती समित्या प्रत्येक ग्राम पंचायतला गठित करुन गावातील वाद लोक सहभागातुन गांवातच मिटवुन आर्थिक नुसान व सामाजिक सलोखा अबाधित राहिल , पोलिसावरिल ताण तसेच न्यायलयात वाढत चालेले प्रकरण कमी होईल या उदेशाने राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गुहमंत्री आर.आर.पाटिल यांच्या संकल्पनेतुन दिनांक 14 ऑगस्ट 2008 रोजी 62 पानी एक परिपत्रक काढण्यात आले. व त्यानुसार गांवा गांवात महात्मा गांधी तंटामुक्ती समित्या स्थापन करण्यात आल्या.
संकल्पना नविन असल्यामुळे पहिल्या वर्षी राज्यातील अनेक समित्याने वाखाण्याजोगे काम केले तर काहीनी पारितोषक सुघ्दा पटकावले. त्यामुळे काहीकाळ का होईना लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले होते.मात्र हा संचार चेतना जास्त काळ न टिकता गेल्या काही वर्षा पासुन शासनासह प्रशासकिय यंत्रनेलाही समाज हितासाठी राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेचा विसर पडला असुन ही मोहिम कागदोपत्री आहे.
मागिल अनेक वर्षा पासुन तंटामुक्ती समित्यांचे मुल्यमापन करण्याचे काम बंद झाल्याने काही तंटामुक्ती समित्या आपल्या पदाचा दुरुउपयोग करत असुन तंटा गटा चे राजकारण करत ग्रामपंचायत च्या भ्रष्टाचारास स्वरक्षण देत आहे. मागिल अनेक वर्षापासुन ग्रा.प.कार्यालय मांडवी याच्या भ्रष्टाचाराच्या व इतर अनेक तक्रारी केल्या असुन याचा वचपा काढण्यासाठी कोनत्याही प्रकारचा तक्रार अर्ज न घेता व त्याच्या कार्य क्षेत्रात नसताना सुघ्दा कोनतीही पुर्व सुचना न देता पारिवारीक शेती विवादाच्या मोक्यावर जाउुन फोन केला.तसेच नितिन सिंह यांनि ग्रा.प. कार्यालयाच्या विरोधात तक्रार केली . त्यांना सुध्दा शेतात बोलवण्यात आले. मिटलेल्या प्रकरणा विषयी धमकावुन चुकीचे निर्णय देउुन वाद वाढवण्यात आला.
या चुकीचे निर्णय विरोधात ग्रा.प.कार्यालय तहसिल कार्यालयास प.स. कार्यालय ब पोलिस स्टेशन मध्ये तक्रार केली असता काहीच कार्यवाही झाली नाही.

  • Related Posts

    ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा; रुपामाता फाऊंडेशनचे सचिव अँड. अजित गुंड पाटील यांचीमागणी( पावसाळ्यापुर्वी वीज यंत्रणा मजबूत करण्याची मागणी.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी ) – तालुक्यातील ढोकी व परिसरातील गावांमध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, ढोकी येथील ३३ केव्ही सब-स्टेशनची क्षमता वाढवावी तसेच परिसरातील सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण…

    तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा ; तीर्थ बुद्रुक गावात विकासाचा थेट संवाद

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) – जिल्हा प्रशासनाचा प्रमुख गावात मुक्कामी राहून थेट गावपातळीवर लोकांशी संवाद साधत असेल,तर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मोठी मदत होते, याचा प्रत्यय तुळजापूर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *