लातूरमध्ये पत्रकारांचे घरकुलांचे स्वप्न होणार साकार!

Spread the love

लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेची झाली नोंदणी; लवकरच कार्यकारिणी निवड

लातूर : लातूर शहरात पत्रकारांच्या घरकुलांचे स्वप्न अखेर साकार होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून महाराष्ट्रात सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या पत्रकार गृहनिर्माण संस्थेची नोंदणी पूर्णत्वास गेली आहे. मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेची नोंदणी प्रक्रिया आज अखेर पूर्ण झाली. संस्था नोंदणीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले असून लवकरच (Journalists Ghalkul) गृहनिर्माण संस्था कार्यकारिणीची निवड करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सर्वेसर्वा नरसिंह घोणे यांनी दिली.

लातूरचा नावलौकिक देश परदेशात करणारे लोकनेते विलासराव देशमुख यांच्या बाभळगाव या जन्मभूमीत पत्रकारांच्या घरकुलांचे स्वप्न साकार होत आहे. महाराष्ट्रात जिल्हास्तरावर इतक्या मोठ्या प्रमाणात पत्रकारांसाठी घरकुले निर्माण करणारी ही एकमेव व राज्यातील पहिलीच गृहनिर्माण संस्था ठरणार आहे. जिल्ह्यातील पत्रकारांचे नेते नरसिंह घोणे यांच्या नेतृत्वाखाली 2019-20 यावर्षी (Journalists Ghalkul) पत्रकार गृहनिर्माणसाठी बाभळगाव येथील गट नंबर 18 आणि 41 येथे जागेची खरेदी करण्यात आली.

लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या., गट नं. १८ आणि ४१, मौजे बाभळगाव, एन.ए.नं.२०२४/जेएमबी-१/डेस्क-१/लातूर/सीआर-४८ दि.१४/०३/२०२४, प्लॉट नंबर ०१ ते ०२, नविन रिंग रोड, सारोळा- बाभळगाव रोड, बाभळगाव, ही संस्था नोंदणी क्रमांक एलटीआर/एलटीआर/एचएसजी (टीओ)/१४७६/२०२५, दिनांक :- ०४/०४/२०२५ नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र नियम क्रमांक XXIV) कलम ९ (१) आणि कलम १५४ (ब) (२) अन्वये नोंदविण्यात आली आहे.

नियोजित लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण संस्थेची वसाहत (Journalists Ghalkul) पूर्ण करण्यासाठी संस्था कार्यकारिणी निवड करण्यात येणार आहे. कार्यकारिणी निवड झाल्यानंतर गृहनिर्माण कार्याच्या भूमिपूजनाचा मुहूर्त जाहीर करण्यात येणार असल्याचे या संस्थेचे सर्वेसर्वा नरसिंह घोणे  सांगितले.

  • Related Posts

    ‘हरित धाराशिव’ची जय्यत तयारी ; सामाजिक वनीकरण विभागाकडून ३५ लाखांहून अधिक रोपांची निर्मितीजिल्हाधिकारी कीर्तीकुमार पूजार यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १५ जूनपासून शासकीय दरात रोपे उपलब्ध

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्याला अधिक हिरवेगार, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने नेण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘हरित धाराशिव अभियान २०२६’ ची तयारी अंतिम टप्प्यात…

    व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनांच्या रांगाच रांगा , महामार्गावर अपघात झाल्यास कोण जबाबदार

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : शहरा नजीक असलेल्या समाधान हॉटेल जवळील महानगर गॅस पंप यांच्या मिसाळ नियोजनाचा फटका बाहेरगावच्या भाविकांना बसण्याची शक्यता असून भाविकांच्या वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *