लातूरमध्ये पत्रकारांचे घरकुलांचे स्वप्न होणार साकार!

Spread the love

लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेची झाली नोंदणी; लवकरच कार्यकारिणी निवड

लातूर : लातूर शहरात पत्रकारांच्या घरकुलांचे स्वप्न अखेर साकार होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून महाराष्ट्रात सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या पत्रकार गृहनिर्माण संस्थेची नोंदणी पूर्णत्वास गेली आहे. मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेची नोंदणी प्रक्रिया आज अखेर पूर्ण झाली. संस्था नोंदणीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले असून लवकरच (Journalists Ghalkul) गृहनिर्माण संस्था कार्यकारिणीची निवड करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सर्वेसर्वा नरसिंह घोणे यांनी दिली.

लातूरचा नावलौकिक देश परदेशात करणारे लोकनेते विलासराव देशमुख यांच्या बाभळगाव या जन्मभूमीत पत्रकारांच्या घरकुलांचे स्वप्न साकार होत आहे. महाराष्ट्रात जिल्हास्तरावर इतक्या मोठ्या प्रमाणात पत्रकारांसाठी घरकुले निर्माण करणारी ही एकमेव व राज्यातील पहिलीच गृहनिर्माण संस्था ठरणार आहे. जिल्ह्यातील पत्रकारांचे नेते नरसिंह घोणे यांच्या नेतृत्वाखाली 2019-20 यावर्षी (Journalists Ghalkul) पत्रकार गृहनिर्माणसाठी बाभळगाव येथील गट नंबर 18 आणि 41 येथे जागेची खरेदी करण्यात आली.

लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या., गट नं. १८ आणि ४१, मौजे बाभळगाव, एन.ए.नं.२०२४/जेएमबी-१/डेस्क-१/लातूर/सीआर-४८ दि.१४/०३/२०२४, प्लॉट नंबर ०१ ते ०२, नविन रिंग रोड, सारोळा- बाभळगाव रोड, बाभळगाव, ही संस्था नोंदणी क्रमांक एलटीआर/एलटीआर/एचएसजी (टीओ)/१४७६/२०२५, दिनांक :- ०४/०४/२०२५ नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र नियम क्रमांक XXIV) कलम ९ (१) आणि कलम १५४ (ब) (२) अन्वये नोंदविण्यात आली आहे.

नियोजित लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण संस्थेची वसाहत (Journalists Ghalkul) पूर्ण करण्यासाठी संस्था कार्यकारिणी निवड करण्यात येणार आहे. कार्यकारिणी निवड झाल्यानंतर गृहनिर्माण कार्याच्या भूमिपूजनाचा मुहूर्त जाहीर करण्यात येणार असल्याचे या संस्थेचे सर्वेसर्वा नरसिंह घोणे  सांगितले.

  • Related Posts

    रेल्वेच्या विभागीय समितीच्या पुणे येथील बैठकीत धाराशिव, बार्शी, लातूर व मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी महत्त्वपूर्ण मागण्या

    Spread the love

    Spread the loveपुणे  – रेल्वेच्या पुणे व सोलापूर विभागाच्या विभागीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज पुणे येथे पार पडली. या बैठकीस रेल्वेचे जनरल मॅनेजर श्री धरम वीर मीना, खासदार डॉ. सुप्रिया…

    विजेची वाढती गरज भागवण्यासाठी ‘पवन ऊर्जा'(Wind Energy) ठरणार गेमचेंजर

    Spread the love

    Spread the loveमहाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला होतेय 5 गिगावॅट पवन ऊर्जा निर्मिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2070 पर्यंत भारत शून्य कार्बन उत्सर्जन (Net Zero Emission) करण्याचे लक्ष्य ठेवले असून 26…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *