शिधापत्रिका धारकांसाठी ई-केवायसी बंधनकारक ; 30 एप्रिलपर्यंत मुदत

Spread the love

धाराशिव –  शिधापत्रिकाधारकांना आधार क्रमांक जोडण्यासाठी (ई-केवायसी) करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल २०२५ आहे.आतापर्यंत धाराशिव तालुक्यात ७१ टक्के शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे.

ई-केवायसीसाठी ‘मेरा ई-केवायसी’ अॅपद्वारे नागरिकांना घरी बसूनच संपूर्ण प्रक्रिया करता येणार आहे.यासाठी आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आवश्यक असून,ओटीपीच्या माध्यमातून पडताळणी केली जाईल.त्यानंतर चेहऱ्याच्या पडताळणीसाठी https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd या अॅपचा वापर करून प्रक्रिया पूर्ण करता येईल.

यापूर्वी स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी करावी लागत होती.मात्र, तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.यावर उपाय म्हणून सरकारने ‘मेरा ई-केवायसी’ अॅप विकसित केले आहे,अशी माहिती तहसीलदार श्रीमती डॉ.मृणाल जाधव यांनी दिली आहे.

ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय धान्याचा लाभ घेता येणार नाही.अपात्र लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे.

  • Related Posts

    सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणावर प्रशासन करणार कारवाईहोर्डिंग्ज,बॅनर्ससाठी पूर्वपरवानगी बंधनकारक ; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) – विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.निवडणूक कालावधीत होर्डिंग्ज,बॅनर्स,पोस्टर्स…

    सोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज

    Spread the love

    Spread the loveसोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज; IAS कुशल जैन आणि IPS वृष्टी जैन यांच्याकडे जिल्ह्याची धुरा!सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *