धाराशिव – शिधापत्रिकाधारकांना आधार क्रमांक जोडण्यासाठी (ई-केवायसी) करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल २०२५ आहे.आतापर्यंत धाराशिव तालुक्यात ७१ टक्के शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे.
ई-केवायसीसाठी ‘मेरा ई-केवायसी’ अॅपद्वारे नागरिकांना घरी बसूनच संपूर्ण प्रक्रिया करता येणार आहे.यासाठी आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आवश्यक असून,ओटीपीच्या माध्यमातून पडताळणी केली जाईल.त्यानंतर चेहऱ्याच्या पडताळणीसाठी https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd या अॅपचा वापर करून प्रक्रिया पूर्ण करता येईल.
यापूर्वी स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी करावी लागत होती.मात्र, तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.यावर उपाय म्हणून सरकारने ‘मेरा ई-केवायसी’ अॅप विकसित केले आहे,अशी माहिती तहसीलदार श्रीमती डॉ.मृणाल जाधव यांनी दिली आहे.
ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय धान्याचा लाभ घेता येणार नाही.अपात्र लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे.