शिधापत्रिका धारकांसाठी ई-केवायसी बंधनकारक ; 30 एप्रिलपर्यंत मुदत

Spread the love

धाराशिव –  शिधापत्रिकाधारकांना आधार क्रमांक जोडण्यासाठी (ई-केवायसी) करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल २०२५ आहे.आतापर्यंत धाराशिव तालुक्यात ७१ टक्के शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे.

ई-केवायसीसाठी ‘मेरा ई-केवायसी’ अॅपद्वारे नागरिकांना घरी बसूनच संपूर्ण प्रक्रिया करता येणार आहे.यासाठी आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आवश्यक असून,ओटीपीच्या माध्यमातून पडताळणी केली जाईल.त्यानंतर चेहऱ्याच्या पडताळणीसाठी https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd या अॅपचा वापर करून प्रक्रिया पूर्ण करता येईल.

यापूर्वी स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी करावी लागत होती.मात्र, तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.यावर उपाय म्हणून सरकारने ‘मेरा ई-केवायसी’ अॅप विकसित केले आहे,अशी माहिती तहसीलदार श्रीमती डॉ.मृणाल जाधव यांनी दिली आहे.

ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय धान्याचा लाभ घेता येणार नाही.अपात्र लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे.

  • Related Posts

    महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६’ अंतर्गतलातूरमध्ये एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

    Spread the love

    Spread the loveलातूर – : राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि निर्यात वृद्धीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘महा…

    संपूर्णता अभियान २.० चा शुभारंभ‘आकांक्षित जिल्हा’ ही ओळख पुसण्याचा संकल्प करूया-जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संपूर्णता अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा अर्थात संपूर्णता अभियान २.० चा शुभारंभ आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या हस्ते साईन बोर्डचे अनावरण व दीपप्रज्वलन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *