शिधापत्रिका धारकांसाठी ई-केवायसी बंधनकारक ; 30 एप्रिलपर्यंत मुदत

Spread the love

धाराशिव –  शिधापत्रिकाधारकांना आधार क्रमांक जोडण्यासाठी (ई-केवायसी) करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल २०२५ आहे.आतापर्यंत धाराशिव तालुक्यात ७१ टक्के शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे.

ई-केवायसीसाठी ‘मेरा ई-केवायसी’ अॅपद्वारे नागरिकांना घरी बसूनच संपूर्ण प्रक्रिया करता येणार आहे.यासाठी आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आवश्यक असून,ओटीपीच्या माध्यमातून पडताळणी केली जाईल.त्यानंतर चेहऱ्याच्या पडताळणीसाठी https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd या अॅपचा वापर करून प्रक्रिया पूर्ण करता येईल.

यापूर्वी स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी करावी लागत होती.मात्र, तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.यावर उपाय म्हणून सरकारने ‘मेरा ई-केवायसी’ अॅप विकसित केले आहे,अशी माहिती तहसीलदार श्रीमती डॉ.मृणाल जाधव यांनी दिली आहे.

ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय धान्याचा लाभ घेता येणार नाही.अपात्र लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे.

  • Related Posts

    राज्यातील १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंढे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी

    Spread the love

    Spread the loveमुंबई : राज्य शासनाने आज मोठा प्रशासकीय फेरबदल करत १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये कर्तव्यदक्ष आणि धडाडीचे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांचाही समावेश…

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वार्डाची सुरक्षा समिती सदस्यांकडून पाहणी.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे उष्माघात वार्ड पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवण्यात आला आहे. रुग्णांना तातडीने व योग्य उपचार मिळावेत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *