कुसुमाग्रजांप्रमाणे दर्जेदार साहित्य निर्मिती करावी – नितीन तावडे- –

Spread the love

धाराशिव -“कुसुमाग्रजांप्रमाणे चौफेर आणि ज्ञानपीठ पुरस्काराच्या दर्जाचं लेखन नव्या पिढीने केलं पाहिजे ” असे विचार नगर वाचनालयाचे
व म.सा.प. चे अध्यक्ष नितीन तावडे यानी व्यक्त केले.
ते मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नगर वाचनालय येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
ते पुढे म्हणाले की वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांनी कविता,कथा, कादंबरी,ललित लेखन ,निबंध,नाटक अशा सर्वच साहित्यप्रकारामध्ये खूप मोठी आणि दर्जेदार साहित्यनिर्मिती करून मराठी भाषेची मोठी सेवा केली आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन नव्या पिढीतील लेखकांनी साहित्य निर्मिती करून मराठी भाषेची सेवा करावी.
यावेळी कार्यक्रमास उद्योजक बालाजी जोळदापके, व्यापारी
सूरज वांजरे,वेलनेस कोच दयानंद बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते सुदेश माळाळे व नगर वाचनालयाचे ग्रंथपाल सुयोग जोशी, सहाय्यक ग्रंथपाल विजय वाघमारे, डी.के.शेख,उषा पानढवले
महानंदा मसने,याकूब पठाण ई. कर्मचारी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

  • Related Posts

    लोहटा पूर्व गावास महसुली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा! महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक , आमदार कैलास पाटील यांची माहिती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ता. 14: कळंब तालुक्यातील लोहटा (पूर्व) गावाला महसुली ओळख मिळवण्यासाठी लढा द्यावा लागला होता अखेर या गावास आता महसूली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आमदार कैलास…

    श्री. सिद्धीविनायक सोशल फाऊंडेशनचा सहकार सन्मान उपक्रम जबाबदारीच्या पलीकडचा संवाद

    Spread the love

    Spread the loveधाराशिव सहकार दिनाचे औचित्य साधून श्री. सिद्धीविनायक सोशल फाऊंडेशन, धाराशिव यांच्या वतीने संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार, धाराशिव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *