कुसुमाग्रजांप्रमाणे दर्जेदार साहित्य निर्मिती करावी – नितीन तावडे- –

Spread the love

धाराशिव -“कुसुमाग्रजांप्रमाणे चौफेर आणि ज्ञानपीठ पुरस्काराच्या दर्जाचं लेखन नव्या पिढीने केलं पाहिजे ” असे विचार नगर वाचनालयाचे
व म.सा.प. चे अध्यक्ष नितीन तावडे यानी व्यक्त केले.
ते मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नगर वाचनालय येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
ते पुढे म्हणाले की वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांनी कविता,कथा, कादंबरी,ललित लेखन ,निबंध,नाटक अशा सर्वच साहित्यप्रकारामध्ये खूप मोठी आणि दर्जेदार साहित्यनिर्मिती करून मराठी भाषेची मोठी सेवा केली आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन नव्या पिढीतील लेखकांनी साहित्य निर्मिती करून मराठी भाषेची सेवा करावी.
यावेळी कार्यक्रमास उद्योजक बालाजी जोळदापके, व्यापारी
सूरज वांजरे,वेलनेस कोच दयानंद बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते सुदेश माळाळे व नगर वाचनालयाचे ग्रंथपाल सुयोग जोशी, सहाय्यक ग्रंथपाल विजय वाघमारे, डी.के.शेख,उषा पानढवले
महानंदा मसने,याकूब पठाण ई. कर्मचारी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

  • Related Posts

    गडकोट विकास महामंडळासाठी जागर प्रतिष्ठानचा लढा तीव्र; तुळजापूरात किसन पाटील चव्हाण यांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी

    Spread the love

    Spread the loveराज्यातील १२० तालुक्यांतील तहसील कार्यालयांना निवेदन; शासनाने तातडीने निर्णय घ्यावा – इतिहासप्रेमींची मागणी

    अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ( प्रतिनिधी )स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन साजरा करताना आपण त्यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाला स्मरण करतो. पण त्याच संभाजी महाराज यांच्या स्मारकाच काम संथ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *