धाराशिव -“कुसुमाग्रजांप्रमाणे चौफेर आणि ज्ञानपीठ पुरस्काराच्या दर्जाचं लेखन नव्या पिढीने केलं पाहिजे ” असे विचार नगर वाचनालयाचे
व म.सा.प. चे अध्यक्ष नितीन तावडे यानी व्यक्त केले.
ते मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नगर वाचनालय येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
ते पुढे म्हणाले की वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांनी कविता,कथा, कादंबरी,ललित लेखन ,निबंध,नाटक अशा सर्वच साहित्यप्रकारामध्ये खूप मोठी आणि दर्जेदार साहित्यनिर्मिती करून मराठी भाषेची मोठी सेवा केली आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन नव्या पिढीतील लेखकांनी साहित्य निर्मिती करून मराठी भाषेची सेवा करावी.
यावेळी कार्यक्रमास उद्योजक बालाजी जोळदापके, व्यापारी
सूरज वांजरे,वेलनेस कोच दयानंद बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते सुदेश माळाळे व नगर वाचनालयाचे ग्रंथपाल सुयोग जोशी, सहाय्यक ग्रंथपाल विजय वाघमारे, डी.के.शेख,उषा पानढवले
महानंदा मसने,याकूब पठाण ई. कर्मचारी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
आपत्ती व्यवस्थापनाला नवी ताकद : पूर,आग आणि बचावकार्यासाठी अत्याधुनिक वाहनेपालकमंत्र्यांनी केले लोकार्पण
Spread the loveधाराशिव – जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तींचा वाढता धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव अंतर्गत खरेदी करण्यात…