जिल्ह्यात २१ वी पशुगणना अंतिम टप्प्यातपशुपालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

Spread the love

धाराशिव – २१ वी पशुगणना २५ नोव्हेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत पार पडत असून,धाराशिव जिल्ह्यातील ७५ टक्के पशुगणना पूर्ण झाली आहे. पशुपालकांनी आपल्या सर्व पशुधनाची अचूक माहिती प्रगणकांकडे नोंदवावी.असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पशुगणना ३१ मार्चपर्यंत पूर्ण करायची आहे.जिल्ह्यातील ८९८ गावे आणि शहरी प्रभागांपैकी ६७२ ठिकाणी (७५ टक्के) पशुगणना पूर्ण झाली आहे.उर्वरित २५ टक्के गणना वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने प्रगणक आणि पर्यवेक्षकांना सूचना दिल्या आहेत.

पशुगणनेसाठी ११० प्रगणक आणि २४ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.घरोघरी जाऊन गणना करणाऱ्या प्रगणकांना पशुपालक, शेतकरी आणि नागरिकांनी सहकार्य करावे,तसेच ज्या पशुपालकांनी आपले पशुधन किंवा शहरी भागातील पाळीव प्राणी नोंदवलेले नाहीत,त्यांनी तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

पशुगणना १०० टक्के पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी धाराशिव,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,पशुसंवर्धन विभागाचे उप आयुक्त आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी सहकार्य करावे,असे आवाहन केले आहे.

  • Related Posts

    सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणावर प्रशासन करणार कारवाईहोर्डिंग्ज,बॅनर्ससाठी पूर्वपरवानगी बंधनकारक ; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) – विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.निवडणूक कालावधीत होर्डिंग्ज,बॅनर्स,पोस्टर्स…

    सोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज

    Spread the love

    Spread the loveसोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज; IAS कुशल जैन आणि IPS वृष्टी जैन यांच्याकडे जिल्ह्याची धुरा!सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *