जिल्ह्यात २१ वी पशुगणना अंतिम टप्प्यातपशुपालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

Spread the love

धाराशिव – २१ वी पशुगणना २५ नोव्हेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत पार पडत असून,धाराशिव जिल्ह्यातील ७५ टक्के पशुगणना पूर्ण झाली आहे. पशुपालकांनी आपल्या सर्व पशुधनाची अचूक माहिती प्रगणकांकडे नोंदवावी.असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पशुगणना ३१ मार्चपर्यंत पूर्ण करायची आहे.जिल्ह्यातील ८९८ गावे आणि शहरी प्रभागांपैकी ६७२ ठिकाणी (७५ टक्के) पशुगणना पूर्ण झाली आहे.उर्वरित २५ टक्के गणना वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने प्रगणक आणि पर्यवेक्षकांना सूचना दिल्या आहेत.

पशुगणनेसाठी ११० प्रगणक आणि २४ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.घरोघरी जाऊन गणना करणाऱ्या प्रगणकांना पशुपालक, शेतकरी आणि नागरिकांनी सहकार्य करावे,तसेच ज्या पशुपालकांनी आपले पशुधन किंवा शहरी भागातील पाळीव प्राणी नोंदवलेले नाहीत,त्यांनी तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

पशुगणना १०० टक्के पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी धाराशिव,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,पशुसंवर्धन विभागाचे उप आयुक्त आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी सहकार्य करावे,असे आवाहन केले आहे.

  • Related Posts

    आयुक्त किरण जाधव यांची ‘आपले सरकार’ सेवा केंद्राला भेट;

    Spread the love

    Spread the loveतृतीयपंथीय सक्षमीकरणाचा उपक्रम ठरतोय यशस्वी धाराशिव – लोकसेवा हक्क आयोगचे आयुक्त किरण जाधव यांनी आज १७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरातील ‘आपले सरकार’ सेवा केंद्रास भेट देऊन कामकाजाची…

    घरपोच लोकसेवा हेच ध्येय,आयुक्त श्री.किरण जाधव ,जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – सर्वसामान्य ग्रामस्थांना शासनाच्या सेवा वेळेत व घरपोच पद्धतीने उपलब्ध करून देणे हा लोकसेवा हक्क आयोगाचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रतिपादन लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त किरण जाधव यांनी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *