जिल्ह्यात लाळखुरकत लसीकरण मोहिम सुरू५ लाख ५० हजार लस मात्रा प्राप्त

Spread the love

धाराशिव – जिल्ह्यात १५ फेब्रुवारीपासून लाळखुरकत रोगावरील लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली असून, पुढील ४५ दिवस ही मोहीम राबविण्यात येणार आहे.यासाठी ५ लाख ५० हजार ५०० लसींची उपलब्धता झाली आहे.प्रशासनाने पशुपालकांना त्यांच्या पशुधनाचे वेळेत लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.

लाळखुरकत हा विषाणूजन्य रोग असून, संसर्ग झाल्यास पशुधनाला १०५ ते १०६ डिग्री ताप,तोंड व खुरांमध्ये जखमा होतात. यामुळे जनावरे खाणे-पिणे बंद करतात, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि दुग्ध उत्पादनात घट होते.गर्भवती गायी,म्हशी व शेळ्यांमध्ये गर्भपाताची शक्यताही असते.हा रोग हवेद्वारे वेगाने पसरतो,त्यामुळे प्रतिबंधात्मक लसीकरण हाच एकमेव प्रभावी उपाय आहे.

ही राष्ट्रीय स्तरावरील लसीकरण मोहीम १५ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत राबविली जात आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील ३९ हजार पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे.उर्वरित पशुपालकांनी तातडीने लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातील एकही पशुधन लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने पशुधन विकास अधिकारी,सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षकांना सक्त सूचना दिल्या असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,जिल्हा परिषद धाराशिव यांनी दिली.

  • Related Posts

    आयुक्त किरण जाधव यांची ‘आपले सरकार’ सेवा केंद्राला भेट;

    Spread the love

    Spread the loveतृतीयपंथीय सक्षमीकरणाचा उपक्रम ठरतोय यशस्वी धाराशिव – लोकसेवा हक्क आयोगचे आयुक्त किरण जाधव यांनी आज १७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरातील ‘आपले सरकार’ सेवा केंद्रास भेट देऊन कामकाजाची…

    घरपोच लोकसेवा हेच ध्येय,आयुक्त श्री.किरण जाधव ,जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – सर्वसामान्य ग्रामस्थांना शासनाच्या सेवा वेळेत व घरपोच पद्धतीने उपलब्ध करून देणे हा लोकसेवा हक्क आयोगाचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रतिपादन लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त किरण जाधव यांनी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *