धाराशिव शहरातील प्रभाग क्र. 18 मधील नागरिकांचे हाल – गटारी तुंबल्याने दुर्गंधीचा त्रास

Spread the love

धाराशिव : शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील दर्गा देवस्थान समोरील परिसरात अस्वच्छतेमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. येथील गटारी तुंबल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, स्वच्छतेच्या अभावामुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

नियमित नाली सफाई व रस्ते स्वच्छता प्रशासनाने ठरवून दिलेल्या मानकांप्रमाणे केली जात नाही, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. आठ दिवसांतून एकदा नाली सफाई करणे बंधनकारक असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. यासंदर्भात नगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनही केवळ आश्वासनांची उडवा उडवी होत आहे, अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, उरूस (जत्रा) पार पडल्यानंतर दोन महिने उलटले तरी अद्याप गटारी स्वच्छ केल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे डास, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन स्वच्छता व्यवस्था सुधारावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.

  • Related Posts

    जगभरातून येणाऱ्या भाविकांसाठी तुळजापुरात आता ‘व्हीव्हीआयपी’ विश्रामगृह

    Spread the love

    Spread the loveतीर्थक्षेत्र तुळजापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा धाराशिव  (प्रतिनिधी ) – तुळजापूरचा कायापालट होत आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामाची ४३८ कोटी रुपयांची निविदाही प्रसिद्ध झाली आहे. तीर्थक्षेत्र तुळजापुरात…

    ग्रामीण भागात ग्रंथालय चळवळ वाढायला पाहिजे – श्री.गजानन गाडेकर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ग्रंथोत्सव २०२५ चे थाटात उद्घाटन ग्रंथ दिंडी ठरली मुख्य आकर्षण वाशी येथील अजिंक्य विद्या मंदिर परिसरात महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *