धाराशिव शहरातील प्रभाग क्र. 18 मधील नागरिकांचे हाल – गटारी तुंबल्याने दुर्गंधीचा त्रास

Spread the love

धाराशिव : शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील दर्गा देवस्थान समोरील परिसरात अस्वच्छतेमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. येथील गटारी तुंबल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, स्वच्छतेच्या अभावामुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

नियमित नाली सफाई व रस्ते स्वच्छता प्रशासनाने ठरवून दिलेल्या मानकांप्रमाणे केली जात नाही, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. आठ दिवसांतून एकदा नाली सफाई करणे बंधनकारक असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. यासंदर्भात नगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनही केवळ आश्वासनांची उडवा उडवी होत आहे, अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, उरूस (जत्रा) पार पडल्यानंतर दोन महिने उलटले तरी अद्याप गटारी स्वच्छ केल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे डास, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन स्वच्छता व्यवस्था सुधारावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.

  • Related Posts

    सोयाबीनवरील शंखी गोगलगाय, पैसा/वाणी किडीचा वाढता प्रादुर्भाव ; सामूहिक नियंत्रणासाठी कृषी विभागाचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – चालू खरीप हंगामात मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी व उगवण पूर्ण झाली आहे.मात्र, सध्या जिल्ह्यातील काही भागांत शंखी गोगलगाय तसेच पैसा/वाणी (Millipede) किडीचा…

    ‘पावसाचा प्रत्येक थेंब पिकासाठी वापरा’ ; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बीबीएफ यंत्र चालवत केली सोयाबीन पेरणी,तूरही टोकण पद्धतीने लावली

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – बदलते हवामान,कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड… अशा अनिश्चित परिस्थितीतही सोयाबीनचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रुंद सरी-वरंबा (BBF) तंत्रज्ञान हा सर्वोत्तम पर्याय असल्याचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *