“कनि महिला मंच यांचा हळदीकुंकू कार्यक्रम धाराशिव मध्ये उत्साहात संपन्न”

Spread the love

समृद्धी महिला गृह उद्योग धाराशिव व राज ज्वेलर्स धाराशिव यांच्या सहकार्याने साजरा झाला.

धाराशिव – कनि महिला मंच सौ. कल्याणी उल्हास कदम पुणे (संस्थापक अध्यक्ष)यांचे नेतृत्वाखालीगेल्या पाच वर्षापासून महिलांसाठी अविरतपणे काम करत आहे ,यामधून महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचा बिजनेस वाढवता यावा यासाठी त्यांनी महिला मंचच्या वतीने गेली अनेक वर्ष महिलांना मार्गदर्शन करून स्वतःच्या पायावर उभा केले आहे.
याची सुरुवात पुणे ,सोलापूर , या संपूर्ण जिल्ह्य़ात झाली असून आता ते धाराशिव मध्ये आले आहे .धाराशिव येथील समृद्धी गृह उद्योग एमआयडीसी धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली कनि महिला मंच यांनी प्रबोधन केले.
समृद्धी गृह उद्योग यांनी घेतलेली उत्तुंग भरारी महिलांना सांगितली. त्याचबरोबर त्यांना कनि मंचच्या सभासद करण्यात आल्या. महिलांसाठी खास स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेतून सोन्याची नथ व इतर आकर्षक बक्षीस देण्यात आली .समृद्धी महिला उद्योग यांच्या गिफ्ट सुद्धा याप्रसंगी देण्यात आल्या. अनेक महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता हा कार्यक्रम आई lawns धाराशिव या ठिकाणी साकार झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अँकर विशाल सूर्यवंशी यांनी केली तर महिलांचे गेम अनुजा पानसरे यांनी घेतल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समृद्धी महिला गृह उद्योग यांनी परिश्रम घेतले.कनि महिला मंच ची सुरुवात सौ.कल्याणी उल्हास कदम यांनी पुण्यापासून केली आहे. आज त्याच्या जवळपास दहा ते पंधरा हजार सभासद आहेत व त्याची मूर्तमेढ शितल इंदापूरकर यांनी धाराशिव मध्ये लावली.,या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रेमाताई सुधीर पाटील , माधुरी जगदाळे मॅडम, शितल इंदापूरकर ताई, रोहिणी अडसुळ ताई ,शबाना मॅडम उपस्थित होत्या. या स्पर्धेची सोन्याच्या नथची मानकरी ठरली भाग्यश्री लाड, ही सोन्याची नथ राज ज्वेलर्स यांनी दिली होती.तर उपविजेत्या ठरल्या शुभांगी तीर्थकर व भाग्यश्री भोईटे यांचे गिफ्ट देऊन अभिनंदन केले…..या कार्यक्रमात सोन्याच्या नथ ची मानकरी ठरली भाग्यश्री लाड,, तिच्या शिरपेचात घालून तिला सोन्याची नथ बक्षीस देण्यात आली.

  • Related Posts

    गडकोट विकास महामंडळासाठी जागर प्रतिष्ठानचा लढा तीव्र; तुळजापूरात किसन पाटील चव्हाण यांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी

    Spread the love

    Spread the loveराज्यातील १२० तालुक्यांतील तहसील कार्यालयांना निवेदन; शासनाने तातडीने निर्णय घ्यावा – इतिहासप्रेमींची मागणी

    अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ( प्रतिनिधी )स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन साजरा करताना आपण त्यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाला स्मरण करतो. पण त्याच संभाजी महाराज यांच्या स्मारकाच काम संथ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *