“कनि महिला मंच यांचा हळदीकुंकू कार्यक्रम धाराशिव मध्ये उत्साहात संपन्न”

Spread the love

समृद्धी महिला गृह उद्योग धाराशिव व राज ज्वेलर्स धाराशिव यांच्या सहकार्याने साजरा झाला.

धाराशिव – कनि महिला मंच सौ. कल्याणी उल्हास कदम पुणे (संस्थापक अध्यक्ष)यांचे नेतृत्वाखालीगेल्या पाच वर्षापासून महिलांसाठी अविरतपणे काम करत आहे ,यामधून महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचा बिजनेस वाढवता यावा यासाठी त्यांनी महिला मंचच्या वतीने गेली अनेक वर्ष महिलांना मार्गदर्शन करून स्वतःच्या पायावर उभा केले आहे.
याची सुरुवात पुणे ,सोलापूर , या संपूर्ण जिल्ह्य़ात झाली असून आता ते धाराशिव मध्ये आले आहे .धाराशिव येथील समृद्धी गृह उद्योग एमआयडीसी धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली कनि महिला मंच यांनी प्रबोधन केले.
समृद्धी गृह उद्योग यांनी घेतलेली उत्तुंग भरारी महिलांना सांगितली. त्याचबरोबर त्यांना कनि मंचच्या सभासद करण्यात आल्या. महिलांसाठी खास स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेतून सोन्याची नथ व इतर आकर्षक बक्षीस देण्यात आली .समृद्धी महिला उद्योग यांच्या गिफ्ट सुद्धा याप्रसंगी देण्यात आल्या. अनेक महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता हा कार्यक्रम आई lawns धाराशिव या ठिकाणी साकार झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अँकर विशाल सूर्यवंशी यांनी केली तर महिलांचे गेम अनुजा पानसरे यांनी घेतल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समृद्धी महिला गृह उद्योग यांनी परिश्रम घेतले.कनि महिला मंच ची सुरुवात सौ.कल्याणी उल्हास कदम यांनी पुण्यापासून केली आहे. आज त्याच्या जवळपास दहा ते पंधरा हजार सभासद आहेत व त्याची मूर्तमेढ शितल इंदापूरकर यांनी धाराशिव मध्ये लावली.,या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रेमाताई सुधीर पाटील , माधुरी जगदाळे मॅडम, शितल इंदापूरकर ताई, रोहिणी अडसुळ ताई ,शबाना मॅडम उपस्थित होत्या. या स्पर्धेची सोन्याच्या नथची मानकरी ठरली भाग्यश्री लाड, ही सोन्याची नथ राज ज्वेलर्स यांनी दिली होती.तर उपविजेत्या ठरल्या शुभांगी तीर्थकर व भाग्यश्री भोईटे यांचे गिफ्ट देऊन अभिनंदन केले…..या कार्यक्रमात सोन्याच्या नथ ची मानकरी ठरली भाग्यश्री लाड,, तिच्या शिरपेचात घालून तिला सोन्याची नथ बक्षीस देण्यात आली.

  • Related Posts

    आपत्ती व्यवस्थापनाला नवी ताकद : पूर,आग आणि बचावकार्यासाठी अत्याधुनिक वाहनेपालकमंत्र्यांनी केले लोकार्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तींचा वाढता धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव अंतर्गत खरेदी करण्यात…

    “माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून धाराशिवला निरोगी,सक्षम आणि आदर्श जिल्हा बनवूपालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

    Spread the love

    Spread the loveआरोग्य संस्थांचा लोकार्पण सोहळा माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यशाळा       १ मे रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आरोग्य संस्थांचे ऑनलाईन लोकार्पण आणि ‘माझं गाव आरोग्य संपन्न…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *