माझ्या वडिलांना तर रस्त्यावरून उचलून नेलं. आता काकाला काही झालं तर कोण जबाबदार? प्रशासन नक्की करतंय काय ? – वैभवी देशमुख

Spread the love

बीड – माझ्या वडिलांना तर रस्त्यावरून उचलून नेलं. आता काकाला काही झालं तर कोण जबाबदार? प्रशासन नक्की करतंय काय ? – वैभवी देशमुख

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर 35 दिवस उलटून गेल्यानंतर देशमुख कुटुंबीयांसह मस्साजोग गावात प्रचंड आक्रमकता आहे . संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावातील उंच टाकीवर चढून आंदोलन सुरू केलं आहे . गावातील महिला आंदोलकांनी संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयीत असल्याने टाकीवर चढत आक्रोश व्यक्त केलाय. गावकरी महिलांनी बीड एसपीच्या अंगावर बांगड्या फेकत आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने प्रशासनाला संतप्त सवाल केलाय . माझ्या वडिलांना तर रस्त्यावरून उचलून नेलं .आता काकाला काही झालं तर कोण जबाबदार ? प्रशासन नक्की करतंय काय ? आज माझे पप्पा गेले . काकाला गमावलं तर आम्ही काय करायचं .आज जसा काका वर गेलाय, आरोपींना अटक झाली नाही तर आमचं संपूर्ण कुटुंब टाकीवर जाईल .आमचा एक माणूस गेलाय तर प्रशासन आरोपींना पकडत नाही . ज्यावेळी कुटुंबातील सगळे जातील तेव्हाच हे आरोपींना पकडतील का? अशी आक्रमक भूमिका संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने घेतली आहे.

  • Related Posts

    बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ…

    आचारसंहितेच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम; 146 गुन्हे दाखल, 126 आरोपी अटकेत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) : विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाराशिव जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *