माझ्या वडिलांना तर रस्त्यावरून उचलून नेलं. आता काकाला काही झालं तर कोण जबाबदार? प्रशासन नक्की करतंय काय ? – वैभवी देशमुख

Spread the love

बीड – माझ्या वडिलांना तर रस्त्यावरून उचलून नेलं. आता काकाला काही झालं तर कोण जबाबदार? प्रशासन नक्की करतंय काय ? – वैभवी देशमुख

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर 35 दिवस उलटून गेल्यानंतर देशमुख कुटुंबीयांसह मस्साजोग गावात प्रचंड आक्रमकता आहे . संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावातील उंच टाकीवर चढून आंदोलन सुरू केलं आहे . गावातील महिला आंदोलकांनी संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयीत असल्याने टाकीवर चढत आक्रोश व्यक्त केलाय. गावकरी महिलांनी बीड एसपीच्या अंगावर बांगड्या फेकत आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने प्रशासनाला संतप्त सवाल केलाय . माझ्या वडिलांना तर रस्त्यावरून उचलून नेलं .आता काकाला काही झालं तर कोण जबाबदार ? प्रशासन नक्की करतंय काय ? आज माझे पप्पा गेले . काकाला गमावलं तर आम्ही काय करायचं .आज जसा काका वर गेलाय, आरोपींना अटक झाली नाही तर आमचं संपूर्ण कुटुंब टाकीवर जाईल .आमचा एक माणूस गेलाय तर प्रशासन आरोपींना पकडत नाही . ज्यावेळी कुटुंबातील सगळे जातील तेव्हाच हे आरोपींना पकडतील का? अशी आक्रमक भूमिका संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने घेतली आहे.

  • Related Posts

    लातूरच्या ट्युशन एरिया परिसरात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; मोटार वाहन कायद्याच्या ८६ केसेस, ५८,५०० रुपये दंड व ७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई.

    Spread the love

    Spread the loveलातूर शहर हे राज्यभरात शैक्षणिक पॅटर्नसाठी प्रसिद्ध असून दरवर्षी हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येथे दाखल होतात. ट्युशन एरिया परिसरात सायंकाळी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेस बाधा…

    कळंब पोलिसांची धडक कारवाई; कन्हेरवाडी शिवारात १५ लाखांचा अफू जप्त ?

    Spread the love

    Spread the loveकळंब (प्रतिनिधी) -: कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. कन्हेरवाडी ते मांडवा जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका शेतातून पोलिसांनी तब्बल १०० किलो अफूची झाडे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *