धाराशिव – महाराष्ट्र मधील मराठवाड्यातील हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ सुफी संत हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या येणाऱ्या उर्सच्या काळात सुरक्षा, व्यवस्था आणि सोयीसुविधा सुनिश्चित करण्यासाठी नियम आणि अटींचे काटेकोर पालन करण्याची मागणी मुस्लीम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात,मुस्लीम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशन संस्थेचे जिल्हाध्यक्ष शेख जब्बार अ.सत्तार यांनी उर्स काळात भाविकांना सुरक्षित आणि सुलभ अनुभव देण्यासाठी विविध उपाययोजना सुचवल्या आहेत. यामध्ये निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, हॉटेल छोटे दुकान व कटलरी दुकानांमध्ये दर नियंत्रण करणे, पाळणे (झुले) आणि शोलॅण्डच्या सुरक्षिततेची खात्री करणे आणि विद्युत वीज पुरवठ्याची अखंडता राखणे यांचा समावेश आहे.
याशिवाय, रहदारी नियंत्रण, पाळण्यांची सुरक्षितता तपासणी आणि मागील काळात दुर्घटनांमधून धडा घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला आहे. प्रशासनाने भाविकांच्या हिताला प्राधान्य देऊन त्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य निर्णय घ्यावेत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनातील प्रमुख मुद्देः
■ पारदर्शक निविदा प्रक्रिया: उर्स दरम्यान लागणाऱ्या विविध सेवांसाठी निविदा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात यावी.या मुळे भ्रष्टाचार ला वेळीच आळा बसेल..आणि भाविकांना चांगल्या दर्जा चे सेवा मिळतील.
■ दर नियंत्रणः उर्सच्या काळात हॉटेल आणि कटलरी दुकानांमध्ये वस्तूंचे दर नियंत्रित ठेवण्यात यावेत. भाविकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी हे आवश्यक आहे.
सुरक्षितता: झुले, शोलॅण्ड आणि इतर मनोरंजनाच्या साधनांची सुरक्षितता तपासून त्यांचे योग्य देखभाल करण्यात यावी. मागील वर्षी झालेल्या दुर्घटनांमधून धडा घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
■ अखंडित विद्युत पुरवठा: उर्सच्या काळात भाविकांना त्रास होऊ नये यासाठी अखंडित विद्युत पुरवठा करण्यात यावा.
■ रहदारी नियंत्रणः उर्सच्या काळात मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने रहदारी नियंत्रण करण्यासाठी योग्य व्यवस्था करावी.
■ पाळण्यांची सुरक्षितता पाळण्यांची सुरक्षितता तपासून त्यांच्या वापरासाठी योग्य नियम लागू करावेत.
याशिवाय, निवेदनात मागील उर्सच्या काळात घडलेल्या दुर्घटनांचा उल्लेख करून प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पोलीस अधिक्षक, नगर परिषद, वक्फ बोर्ड, विद्युत वीज mseb पुरवठा विभाग आदी संबंधित विभागांना या निवेदनाच्या प्रती
पाठवण्यात आल्या आहेत. उर्सच्या काळात प्रशासनाकडून या
मागण्यांची दखल घेतली जाईल आणि भाविकांची काळजी,सुरक्षित आणि सुलभ वातावरण प्रदान केली जाईल अशी अपेक्षा आहे..