भ्रष्टाचार निर्मूलन समिती आयोजित शिबीरात बार्शी पोलिसांना मिळाले संमोहनाचे धडे

Spread the love

बार्शी : दैनंदिन कर्तव्य पार पाडत असताना येणाऱ्या मानसिक ताण तणावाशी पोलिसांना नेहमीच सामना करावा लागतो. हा मानसिक ताण कमी करण्यासाठी मन एकाग्र करुन स्वयंसूचना कशा घ्याव्यात आणि मानसिक ताण कसा कमी करावा याविषयीचे प्रशिक्षण देण्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे नवनियुक्त सोलापूर जिल्हा अध्यक्ष विजय अंबादास थोरात ( कोरे) यांच्या संकल्पनेतून सोलापूर येथील संमोहन तज्ञ रविंद्र सोरटे यांच्या स्वसंमोहन प्रशिक्षण शिबीराचे आयोजन भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्यावतीने आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या आरतीने झाली तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे नवनियुक्त पदाधिकारी जिल्हाध्यक्ष विजय अंबादास थोरात (कोरे) यांचा सन्मान उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या हस्ते करण्यात आला तर नव्याने बार्शी तालुक्याच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या संगीता पवार यांचा सन्मान बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी स.पो.नि.दिलीप ढेरे यांच्या हस्ते करण्यात आला .तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सोलापूर जिल्हा पीआरओ प्राध्यापक आणि मुंडे सर यांचा सत्कार बालाजी मुंडे यांच्याकडून करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बाळासाहेब गव्हाणे यांनी केले

बार्शी शहर पोलिस ठाणे येथे आयोजित केलेल्या शिबीरामध्ये सोरटे यांनी स्वयंसूचना घेऊन तणाव कमी करण्याचे तंत्र प्रात्यक्षिकासह शिकविले. या शिबीरात उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल, बार्शी शहर पोलिस निरिक्षक बालाजी कुकडे, तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि दिलीप ढेरे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. भ्रष्टाचार निर्मूलन समितीने ‘जनसंवाद’ च्या माध्यमातून दिलेले हे प्रशिक्षण तणावमुक्तीसाठी उपयुक्त व फायदेशीर ठरेल असे मत सहभागी शिबीरार्थींनी व्यक्त केले.

याप्रसंगी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विजय कोरे, समितीचे जिल्हा जनसंपर्क अधिकारी प्रा. अनिल मुंढे, बार्शी तालुका उपाध्यक्षा संगीता पवार आदी उपस्थित होते.

  • Related Posts

    आपत्ती व्यवस्थापनाला नवी ताकद : पूर,आग आणि बचावकार्यासाठी अत्याधुनिक वाहनेपालकमंत्र्यांनी केले लोकार्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तींचा वाढता धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव अंतर्गत खरेदी करण्यात…

    “माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून धाराशिवला निरोगी,सक्षम आणि आदर्श जिल्हा बनवूपालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

    Spread the love

    Spread the loveआरोग्य संस्थांचा लोकार्पण सोहळा माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यशाळा       १ मे रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आरोग्य संस्थांचे ऑनलाईन लोकार्पण आणि ‘माझं गाव आरोग्य संपन्न…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *