संतप्त गावकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव

Spread the love

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील नांदुरा गावात जल जीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणी आणि गैरव्यवस्थापनामुळे संतप्त गावकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. जल जीवन मिशन अंतर्गत एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीचा उपयोग गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आला होता. मात्र, शेतकऱ्याने ही विहीर स्वतःच्या शेतीसाठी वापरण्यास सुरुवात केली, ज्यामुळे गावात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला.

गुरुवारी, संतप्त महिलांनी उपविभागीय अभियंताच्या कार्यालयात धरणे दिले. अधिकाऱ्यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर महिलांनी आपले आंदोलन थांबवले. मात्र, या घटनेने जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीतील त्रुटी, कंत्राटदार व अधिकाऱ्यांमधील संगनमत आणि गैरव्यवस्थापन उघड केले आहे. गावकऱ्यांनी या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

  • Related Posts

    आपत्ती व्यवस्थापनाला नवी ताकद : पूर,आग आणि बचावकार्यासाठी अत्याधुनिक वाहनेपालकमंत्र्यांनी केले लोकार्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तींचा वाढता धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव अंतर्गत खरेदी करण्यात…

    “माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून धाराशिवला निरोगी,सक्षम आणि आदर्श जिल्हा बनवूपालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

    Spread the love

    Spread the loveआरोग्य संस्थांचा लोकार्पण सोहळा माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यशाळा       १ मे रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आरोग्य संस्थांचे ऑनलाईन लोकार्पण आणि ‘माझं गाव आरोग्य संपन्न…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *