संतप्त गावकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव

Spread the love

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील नांदुरा गावात जल जीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणी आणि गैरव्यवस्थापनामुळे संतप्त गावकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. जल जीवन मिशन अंतर्गत एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीचा उपयोग गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आला होता. मात्र, शेतकऱ्याने ही विहीर स्वतःच्या शेतीसाठी वापरण्यास सुरुवात केली, ज्यामुळे गावात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला.

गुरुवारी, संतप्त महिलांनी उपविभागीय अभियंताच्या कार्यालयात धरणे दिले. अधिकाऱ्यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर महिलांनी आपले आंदोलन थांबवले. मात्र, या घटनेने जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीतील त्रुटी, कंत्राटदार व अधिकाऱ्यांमधील संगनमत आणि गैरव्यवस्थापन उघड केले आहे. गावकऱ्यांनी या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

  • Related Posts

    गडकोट विकास महामंडळासाठी जागर प्रतिष्ठानचा लढा तीव्र; तुळजापूरात किसन पाटील चव्हाण यांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी

    Spread the love

    Spread the loveराज्यातील १२० तालुक्यांतील तहसील कार्यालयांना निवेदन; शासनाने तातडीने निर्णय घ्यावा – इतिहासप्रेमींची मागणी

    अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ( प्रतिनिधी )स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन साजरा करताना आपण त्यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाला स्मरण करतो. पण त्याच संभाजी महाराज यांच्या स्मारकाच काम संथ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *