‘सेवा तीर्थ’मधून ‘नागरिक देवो भव’चा संदेश; पंतप्रधानांकडून चार मोठ्या योजनांना मंजुरी

Spread the love

नवी दिल्ली : ‘सेवा तीर्थ’ या संकल्पनेतून जनकल्याणाला प्राधान्य देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब, वंचित, शेतकरी, युवा व महिला सक्षमीकरणाशी संबंधित महत्त्वाच्या योजनांवर कार्यारंभाच्या दिवशीच स्वाक्षरी केली. “नागरिक प्रथम” या भूमिकेतून घेतलेल्या या निर्णयांमुळे आरोग्य, कृषी, महिला स्वावलंबन आणि स्टार्टअप क्षेत्राला थेट बूस्टर डोस मिळणार आहे.
सरकारने ‘पीएम राहत (PM RAHAT)’ योजनेला मंजुरी देत अपघातग्रस्तांना ₹1.5 लाखांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘लखपती दीदी’ योजनेचे लक्ष्य दुप्पट करून 6 कोटी करण्यात आले आहे. स्वयंरोजगार व बचतगटांच्या माध्यमातून महिलांना थेट उत्पन्ननिर्मितीची संधी मिळणार असून ग्रामीण अर्थचक्राला गती मिळेल.

कृषी क्षेत्रासाठी कृषी पायाभूत सुविधा निधीचे लक्ष्य ₹1 लाख कोटींवरून ₹2 लाख कोटींवर वाढविण्यात आले आहे. यामुळे गोदामे, कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया केंद्रे यांसारख्या सुविधा उभारल्या जाणार असून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारमूल्य वाढण्यास मदत होईल.

याशिवाय Startup India अंतर्गत ‘स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0’ ला ₹10,000 कोटींची मंजुरी देण्यात आली आहे. प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्स आणि डीप-टेक संशोधनासाठी हा निधी उपयोगी ठरणार आहे.

  • Related Posts

    राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    Spread the love

    Spread the loveमुंबई. -: राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे ५०…

    परळी वैजनाथ येथील ‘अखिल भारतीय महापशुधन एक्स्पो २०२६’ च्या लोगोचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते अनावरण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत परळी वैजनाथ (जिल्हा बीड) येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक ‘अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *