दारू नको, दूध प्या – तरुणांसाठी सकारात्मक संदेश, संभाजी ब्रिगेडचा आगळावेगळा उपक्रम

Spread the love

बार्शी : 31 डिसेंबर रोजी दारू पिण्याची फॅशन झपाट्याने वाढत चालली असून, यामुळे तरुणांचे आयुष्य आणि कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून संभाजी ब्रिगेड मागील तीन वर्षांपासून एक आगळावेगळा उपक्रम राबवत आहे. आनंद काशीद यांच्या संकल्पनेतून 31 डिसेंबरला दारूच्या ऐवजी मोफत दुधाचे वाटप करून तरुणांना व्यसनमुक्त राहण्याचा संदेश दिला जातो.

31 डिसेंबर 2024 ला बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालयासमोर सायंकाळी 6 वाजता या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन परिक्षेत्रीय विभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या हस्ते झाले, तसेच बार्शी शहर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात श्री नालकुल यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी असे उपक्रम खूप महत्त्वाचे आहेत. भविष्यात अशा उपक्रमांमध्ये आम्हीही सहभागी होऊ.” पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनीही हा उपक्रम समाज आणि देशहितासाठी असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहराध्यक्ष बालाजी डोईफोडे, विक्रम बापू घाईतिडक, रवींद्र मुठाळ, शोएब भाई सय्यद, इंजिनिअर विनोद कुमार मिसाळ, दिगंबर रणखांब, सचिन शिंदे आणि इतर कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

“दारू नको, दूध प्या” या घोषणांनी श्री शिवाजी महाविद्यालयाचा परिसर दुमदुमून गेला, आणि तरुणांनी या सकारात्मक बदलाला उत्तम प्रतिसाद दिला.

संभाजी ब्रिगेडच्या या उपक्रमाने व्यसनमुक्त समाजाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे अनेक तरुणांचे जीवन बदलण्यास मदत होईल.

  • Related Posts

    ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा; रुपामाता फाऊंडेशनचे सचिव अँड. अजित गुंड पाटील यांचीमागणी( पावसाळ्यापुर्वी वीज यंत्रणा मजबूत करण्याची मागणी.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी ) – तालुक्यातील ढोकी व परिसरातील गावांमध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, ढोकी येथील ३३ केव्ही सब-स्टेशनची क्षमता वाढवावी तसेच परिसरातील सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण…

    तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा ; तीर्थ बुद्रुक गावात विकासाचा थेट संवाद

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) – जिल्हा प्रशासनाचा प्रमुख गावात मुक्कामी राहून थेट गावपातळीवर लोकांशी संवाद साधत असेल,तर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मोठी मदत होते, याचा प्रत्यय तुळजापूर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *