धाराशिव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी पंचनाम्याचे आदेश

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) : – धाराशिव तालुक्यात झालेल्या मुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतजमिनीतील उभ्या पिकांचे नुकसान, घरे व शेतीसंबंधी साधनसंपत्तीचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासन निर्णयानुसार तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार मृणाल जाधव यांनी दिले आहेत.

या आदेशानुसार महसूल मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांना आपल्या हद्दीतील गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे सादर करण्यास सांगितले आहे. पंचनाम्यात शेतजमिनींचे GPS सक्षम फोटो, शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक तसेच आवश्यक कागदपत्रांचा समावेश असणे अनिवार्य राहील.

पिकांचे पंचनामे शासन निर्णयानुसार Annexure-8 व Annexure-9 या स्वरूपात करण्यात येणार आहेत. संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी निश्चित वेळेत अहवाल तहसील कार्यालयात सादर करणे बंधनकारक असेल. कोणतीही ढिलाई आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही आदेशपत्रात देण्यात आला आहे.

  • Related Posts

    तुळजापूर येथे ‘श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२६’चा दिमाखदार शुभारंभ

    Spread the love

    Spread the loveआधुनिक तंत्रज्ञान,तज्ज्ञ मार्गदर्शन व ७५ स्टॉल्सच्या माध्यमातून बळीराजाला नवे बळ धाराशिव – महाराष्ट्र शासन कृषी विभाग,आत्मा विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री तुळजाभवानी…

    प्रस्तावित कर्ज निवारण योजनेसाठी शेतकऱ्यांनी तातडीने आवश्यक माहिती सादर करावी.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – राज्यातील शेती क्षेत्रात तसेच शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शासनामार्फत अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांच्या अनुषंगाने प्रस्तावित कर्ज निवारण योजनेची आखणी करण्यात येत आहे.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *