तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखडयामध्ये पुजारी व व्यापारी यांच्या सुचना ग्राहय धराव्यात ,खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Spread the love

दि. 28/04/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे आई तुळजाभवानी मातेच्या मंदीर प्रस्तावित विकास आराखड्याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक झाली. या बैठकीस माझ्यासह आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, तसेच मंदिर परिसरातील पुजारी, व्यापारी व नागरिक उपस्थित होते. आई भवानीच्या भक्तीने प्रेरित होऊन, तुळजापूरच्या परंपरांचा आदर राखत आणि भविष्यासाठी मजबूत पायाभरणी करत खालील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले: मंदिराची पवित्र वास्तू व मूळ स्वरूप अखंड राखले जाईल. कोणताही अनावश्यक बदल न करता विकास आराखडा राबवला जाईल. पारंपरिक पूजा-पद्धती व कालाचार कायम राहतील. श्रद्धेचा गाभा अबाधित राहील. सेवेकऱ्यांची सेवा सुरक्षित ट्रस्टमार्फत मानधन तत्वावर सेवेची सलगता राखली जाईल. व्यापाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण! १९८८ मध्ये भूसंपादित रस्त्यावरील व्यापाऱ्यांना मावेजा तत्काळ दिला जाईल. व्यवस्थीत पुनर्वसन व सुविधा: विस्थापित व्यापाऱ्यांचे समर्पक पुनर्वसन सुनिश्चित करण्यात येईल. पुजारी व व्यापारी बांधवांचे हित सर्वोच्च: मूळ बाजारपेठ, व्यापारी व पुजारी यांचे विस्थापन टाळले जाईल. आई भवानीच्या मूळ मूर्तीचे महत्त्व जपले जाईल. १०८ फूट उंच भवानीमातेची भव्य मूर्ती: रामदरा तलाव परिसरात मूळ रचनेचा आदर राखून उभारण्यात येईल. भाविकांसाठी सुलभ दर्शनव्यवस्था: भक्तांचा सन्मान राखत सहज आणि समाधानकारक दर्शनासाठी प्रयत्न केले जातील. तुळजापूरची स्वच्छता व सौंदर्य वाढवण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्यात येतील. आई भवानीच्या भक्तीचा गजर अखंड राहावा, परंपरा अभंग राहाव्यात आणि सर्व स्तरातील नागरिकांचे हित जपले जावे या ध्येयाने आम्ही कटिबद्ध आहोत! तुळजापूरचा विकास म्हणजे आपल्या श्रद्धेचा विजय आहे.

  • Related Posts

    राज्यातील १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंढे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी

    Spread the love

    Spread the loveमुंबई : राज्य शासनाने आज मोठा प्रशासकीय फेरबदल करत १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये कर्तव्यदक्ष आणि धडाडीचे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांचाही समावेश…

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वार्डाची सुरक्षा समिती सदस्यांकडून पाहणी.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे उष्माघात वार्ड पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवण्यात आला आहे. रुग्णांना तातडीने व योग्य उपचार मिळावेत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *