धाराशिव : जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सायकलवरून केली धाराशिव शहराची पाहणी, शहर कायम स्वच्छ ठेवण्याचे दिले निर्देश

Spread the love

धाराशिव – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आज ३ मार्च रोजी सकाळी ७ वाजता धाराशिव शहराची सायकलवरून पाहणी केली.शहर स्वच्छ,सुंदर व अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सह आयुक्त अजित डोके,उपमुख्याधिकारी पृथ्वीराज पवार आदी अधिकाऱ्यांसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथून सायकलस्वारी सुरू करून छत्रपती शिवाजी महाराज चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,महात्मा फुले चौक, विसर्जन विहीर,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पाहणी केली.
शहरातील तुळजापूर-छत्रपती संभाजीनगर मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाली व पेवर ब्लॉक बसवण्याच्या प्रस्तावासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.तसेच,शासकीय कार्यालय परिसरात लावलेले जाहिरात फलक तातडीने हटवण्यात यावे असे सांगितले.

नगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागांचा विकास करून त्या ठिकाणी वाचनालय आणि व्यायामशाळा उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली व त्यादृष्टीने नियोजन करण्याचे सांगितले.शहर स्वच्छ आणि सुशोभित राहावे यासाठी नगरपालिकेसह नागरिकांनीही प्रयत्न करावेत,असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यातील शहरी भागातील स्वच्छता आणि अतिक्रमणमुक्तबाबत जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी पुढील आठवड्यात जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावण्याच्या सूचनाही श्री.डोके यांना दिल्या.

या पाहणी दरम्यान धाराशिव नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता प्रदीप स्वामी, स्थापत्य अभियंता वैजनाथ द्रुकर, नगररचना सहायक मनोज कल्लुरे,तसेच रोहन जाधव,संग्राम भापकर,विक्रम घोलकर,प्रकाश पवार,अशोक फरताडे आणि गिरीजाराम महेर आदी उपस्थित होते.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *