तुळजापूर तालुक्यातील चार प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित

Spread the love

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचे आदेश

तुळजापूर – जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील चार लघुपाटबंधारे प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी हा आदेश जारी केला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील पाणीटंचाईबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडली.या बैठकीत उप कार्यकारी अभियंता,धाराशिव पाटबंधारे विभाग क्र.२,उमरगा यांनी तुळजापूर तालुक्यातील (१) येमाई ल.पा. प्रकल्प,(२) मंगरुळ ल.पा. प्रकल्प,(३) आरळी ल.पा.प्रकल्प आणि (४) केमवाडी सा.त.प्रकल्प या चार प्रकल्पांमध्ये जलसाठा जोता पातळीच्या खाली गेल्याने आणि या प्रकल्पांवरील पाणीपुरवठा योजनांचा विचार करता,पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणले.

यासंदर्भात पाटबंधारे विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या अहवालातही या प्रकल्पांतील पाणीपातळी चिंताजनक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.तसेच,सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या जलसाठ्याचा अवैध उपसा होऊ नये,पाणीपुरवठा योजना सुरळीत चालाव्यात आणि जनावरांसाठीही पिण्याचे पाणी उपलब्ध राहावे,यासाठी हे पाणी राखीव ठेवण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी या चारही प्रकल्पांमधील पाणीसाठा पुढील आदेश येईपर्यंत फक्त पिण्यासाठीच वापरण्यास परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत.जलसाठा नियंत्रित वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकल्पांवरील पाणीसंवर्धनावर लक्ष ठेवावे,असेही निर्देश देण्यात आले आहेत.

  • Related Posts

    सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणावर प्रशासन करणार कारवाईहोर्डिंग्ज,बॅनर्ससाठी पूर्वपरवानगी बंधनकारक ; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) – विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.निवडणूक कालावधीत होर्डिंग्ज,बॅनर्स,पोस्टर्स…

    सोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज

    Spread the love

    Spread the loveसोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज; IAS कुशल जैन आणि IPS वृष्टी जैन यांच्याकडे जिल्ह्याची धुरा!सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *