तुळजापूर तालुक्यातील चार प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित

Spread the love

जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचे आदेश

तुळजापूर – जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील चार लघुपाटबंधारे प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी हा आदेश जारी केला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील पाणीटंचाईबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडली.या बैठकीत उप कार्यकारी अभियंता,धाराशिव पाटबंधारे विभाग क्र.२,उमरगा यांनी तुळजापूर तालुक्यातील (१) येमाई ल.पा. प्रकल्प,(२) मंगरुळ ल.पा. प्रकल्प,(३) आरळी ल.पा.प्रकल्प आणि (४) केमवाडी सा.त.प्रकल्प या चार प्रकल्पांमध्ये जलसाठा जोता पातळीच्या खाली गेल्याने आणि या प्रकल्पांवरील पाणीपुरवठा योजनांचा विचार करता,पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणले.

यासंदर्भात पाटबंधारे विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या अहवालातही या प्रकल्पांतील पाणीपातळी चिंताजनक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.तसेच,सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या जलसाठ्याचा अवैध उपसा होऊ नये,पाणीपुरवठा योजना सुरळीत चालाव्यात आणि जनावरांसाठीही पिण्याचे पाणी उपलब्ध राहावे,यासाठी हे पाणी राखीव ठेवण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी या चारही प्रकल्पांमधील पाणीसाठा पुढील आदेश येईपर्यंत फक्त पिण्यासाठीच वापरण्यास परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत.जलसाठा नियंत्रित वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकल्पांवरील पाणीसंवर्धनावर लक्ष ठेवावे,असेही निर्देश देण्यात आले आहेत.

  • Related Posts

    आयुक्त किरण जाधव यांची ‘आपले सरकार’ सेवा केंद्राला भेट;

    Spread the love

    Spread the loveतृतीयपंथीय सक्षमीकरणाचा उपक्रम ठरतोय यशस्वी धाराशिव – लोकसेवा हक्क आयोगचे आयुक्त किरण जाधव यांनी आज १७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरातील ‘आपले सरकार’ सेवा केंद्रास भेट देऊन कामकाजाची…

    घरपोच लोकसेवा हेच ध्येय,आयुक्त श्री.किरण जाधव ,जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – सर्वसामान्य ग्रामस्थांना शासनाच्या सेवा वेळेत व घरपोच पद्धतीने उपलब्ध करून देणे हा लोकसेवा हक्क आयोगाचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रतिपादन लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त किरण जाधव यांनी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *