श्री माता येडेश्वरी देवी चैत्री पौर्णिमा यात्रेसाठी वाहतूक मार्गात मोठे बदल अवजड वाहनांवर निर्बंध

Spread the love

विश्व प्रशांत न्यूज धाराशिव (प्रतिनिधी) : मौजे येरमाळा (ता. कळंब) येथे होणाऱ्या श्री माता येडेश्वरी देवी चैत्री पौर्णिमा यात्रेनिमित्त 30 मार्च 2026 ते 7 एप्रिल 2026 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार आहे. विशेषतः 2 व 3 एप्रिल रोजी पालखी मिरवणूक, चुनखडी वेचणे व पौर्णिमा निमित्त लाखो भाविक विविध वाहनांनी उपस्थित राहणार असल्याने प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत.जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार व पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 33 (1)(ब) अंतर्गत अधिकार वापरत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत.

या मार्गांवर अवजड वाहनांना बंदी
2 एप्रिल 2026 रोजी रात्री 12:01 ते 3 एप्रिल 2026 मध्यरात्री 12:00 पर्यंत

छत्रपती संभाजीनगर ↔ येरमाळा ↔ बार्शी
बार्शी ↔ कुसळंब ↔ येरमाळा
कळंब ↔ येरमाळा ↔ बार्शी
बार्शी ↔ येरमाळा ↔ परळी / परभणी
कळंब ↔ येरमाळा ↔ छत्रपती संभाजीनगर
या सर्व प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग (डायव्हर्जन)
प्रशासनाने वाहतूक सुरळीत राहावी यासाठी खालील पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत:
छ. संभाजीनगर → बार्शी : येरमाळा उड्डाण पूल → येडशी → बार्शी
बार्शी → छ. संभाजीनगर : कुसळंब → पांगरी → येडशी → येरमाळा उड्डाण पूल
कळंब → बार्शी : मोहा फाटा → दहीफळ → येडशी → पांगरी → कुसळंब
बार्शी → कळंब : कुसळंब → पांगरी → येडशी → दहीफळ → मोहा फाटा
बार्शी → परळी / परभणी : कुसळंब → पांगरी → येडशी → ढोकी → कळंब
परभणी / परळी → बार्शी : कळंब → ढोकी → येडशी → पांगरी → कुसळंब
कळंब → छ. संभाजीनगर : मनुष्यबळ पाटी → मांडवा → वाशी फाटा
छ. संभाजीनगर → कळंब : वाशी फाटा → मांडवा → मनुष्यबळ पाटी

✅ या वाहनांना सूट

पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल
अत्यावश्यक सेवा
हलकी वाहने (Light Vehicles)
एस.टी. बसेस

भाविकांच्या सुरक्षेसाठी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
यात्रेदरम्यान लाखोंच्या संख्येने भाविक एकाच वेळी परिसरात एकत्र येत असल्याने कोणताही अपघात किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • Related Posts

    सोयाबीनवरील शंखी गोगलगाय, पैसा/वाणी किडीचा वाढता प्रादुर्भाव ; सामूहिक नियंत्रणासाठी कृषी विभागाचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – चालू खरीप हंगामात मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी व उगवण पूर्ण झाली आहे.मात्र, सध्या जिल्ह्यातील काही भागांत शंखी गोगलगाय तसेच पैसा/वाणी (Millipede) किडीचा…

    ‘पावसाचा प्रत्येक थेंब पिकासाठी वापरा’ ; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बीबीएफ यंत्र चालवत केली सोयाबीन पेरणी,तूरही टोकण पद्धतीने लावली

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – बदलते हवामान,कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड… अशा अनिश्चित परिस्थितीतही सोयाबीनचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रुंद सरी-वरंबा (BBF) तंत्रज्ञान हा सर्वोत्तम पर्याय असल्याचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *