श्री माता येडेश्वरी देवी चैत्री पौर्णिमा यात्रेसाठी वाहतूक मार्गात मोठे बदल अवजड वाहनांवर निर्बंध

Spread the love

विश्व प्रशांत न्यूज धाराशिव (प्रतिनिधी) : मौजे येरमाळा (ता. कळंब) येथे होणाऱ्या श्री माता येडेश्वरी देवी चैत्री पौर्णिमा यात्रेनिमित्त 30 मार्च 2026 ते 7 एप्रिल 2026 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार आहे. विशेषतः 2 व 3 एप्रिल रोजी पालखी मिरवणूक, चुनखडी वेचणे व पौर्णिमा निमित्त लाखो भाविक विविध वाहनांनी उपस्थित राहणार असल्याने प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत.जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार व पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 33 (1)(ब) अंतर्गत अधिकार वापरत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत.

या मार्गांवर अवजड वाहनांना बंदी
2 एप्रिल 2026 रोजी रात्री 12:01 ते 3 एप्रिल 2026 मध्यरात्री 12:00 पर्यंत

छत्रपती संभाजीनगर ↔ येरमाळा ↔ बार्शी
बार्शी ↔ कुसळंब ↔ येरमाळा
कळंब ↔ येरमाळा ↔ बार्शी
बार्शी ↔ येरमाळा ↔ परळी / परभणी
कळंब ↔ येरमाळा ↔ छत्रपती संभाजीनगर
या सर्व प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग (डायव्हर्जन)
प्रशासनाने वाहतूक सुरळीत राहावी यासाठी खालील पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत:
छ. संभाजीनगर → बार्शी : येरमाळा उड्डाण पूल → येडशी → बार्शी
बार्शी → छ. संभाजीनगर : कुसळंब → पांगरी → येडशी → येरमाळा उड्डाण पूल
कळंब → बार्शी : मोहा फाटा → दहीफळ → येडशी → पांगरी → कुसळंब
बार्शी → कळंब : कुसळंब → पांगरी → येडशी → दहीफळ → मोहा फाटा
बार्शी → परळी / परभणी : कुसळंब → पांगरी → येडशी → ढोकी → कळंब
परभणी / परळी → बार्शी : कळंब → ढोकी → येडशी → पांगरी → कुसळंब
कळंब → छ. संभाजीनगर : मनुष्यबळ पाटी → मांडवा → वाशी फाटा
छ. संभाजीनगर → कळंब : वाशी फाटा → मांडवा → मनुष्यबळ पाटी

✅ या वाहनांना सूट

पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल
अत्यावश्यक सेवा
हलकी वाहने (Light Vehicles)
एस.टी. बसेस

भाविकांच्या सुरक्षेसाठी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
यात्रेदरम्यान लाखोंच्या संख्येने भाविक एकाच वेळी परिसरात एकत्र येत असल्याने कोणताही अपघात किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • Related Posts

    धाराशिवच्या ऐतिहासिक गडांना नवे जीवन : नळदुर्ग आणि परांडा किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी कोट्यवधींची योजना

    Spread the love

    Spread the loveजिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग हे एक ऐतिहासिक स्थान असून,येथे असलेला नळदुर्ग किल्ला हा प्रमुख आकर्षण आहे.हा किल्ला प्राचीन काळातील महत्त्वाचा किल्ला मानला जातो.किल्ल्याची मूळ उभारणी कल्याणीच्या चालुक्य काळात…

    धाराशिवच्या महिलांची उद्योगक्षेत्रात झेप ; ६२२ उद्योजिकांनी घडविला नवा इतिहास

    Spread the love

    Spread the loveधाराशिव –  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील महिलांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय भरारी घेतली असून,पारंपारिक चौकटीतून बाहेर पडत त्यांनी स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या १०१५…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *