अक्कलकोटमध्ये ‘समर्थ महाप्रसाद सेवा’ला चार वर्षे पूर्ण; दत्त जयंतीनिमित्त लाभार्थ्यांना स्वेटर वाटप

Spread the love

अक्कलकोट (प्रतिनिधी) – श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या समर्थ महाप्रसाद सेवा उपक्रमाला दत्त जयंती 2025 रोजी चार वर्षे पूर्ण झाली. संस्थापक अध्यक्ष श्री जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या सेवेमुळे अक्कलकोटमधील २६५ गोरगरीब, वयोवृद्ध, निराधार आणि दिव्यांग नागरिकांना दररोज दोन वेळचे जेवण घरपोच दिले जाते.

या विशेष दिनानिमित्त अन्नछत्रात लाभार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले. स्वामी समर्थांची भूमिका साकारणारे अक्षय मुदवाडकर, तसेच मंडळाचे सचिव मोरे काका, उपाध्यक्ष अभय खोबरे काका, आणि विश्वस्त भाऊ कापसे यांच्या हस्ते ही वाटप प्रक्रिया पार पडली.

दररोज दोन वेळचे जेवण कोणताही खंड न पडता पोहोचवणाऱ्या समर्थ महाप्रसाद सेवा टीममधील आतिश पवार, ड्रायव्हर मारुती बोरकर आणि सेवक आप्पाशा मलवे यांचा विशेष सत्कार करून सन्मान करण्यात आला.

गेल्या चार वर्षांपासून सतत सुरू असलेली ही सेवा अक्कलकोट शहरातील अनेक कुटुंबांसाठी आधार ठरत असून, दत्त जयंतीनिमित्त सेवाभावी कार्याचा गौरव करण्यात आला.

  • Related Posts

    श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुप्रतिपदा उत्सव भक्तीभावात संपन्नहजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

    Spread the love

    Spread the loveश्रीशैल गवंडी, दि. ०२/०२/२६ (अक्कलकोट) — येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज गुरुप्रतिपदा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. पहाटे ५ वाजता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे…

    ‘हिंद-दी-चादर’ ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्तजिल्हास्तरीय शैक्षणिक स्पर्धांचा उत्साहपूर्ण समारोप

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – “हिंद-दी-चादर” म्हणून ओळखले जाणारे शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहाद्दूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त त्यांच्या त्यागशील जीवनकार्याचा,तत्त्वज्ञानाचा व सामाजिक योगदानाचा प्रसार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *