संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जोपर्यंत दोषी फासावर लटकत नाही, तोपर्यंत कारवाई होणार

Spread the love

संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे भाष्य; म्हणाले – ” जोपर्यंत ते फासावर लटकत नाहीत…”

मुंबई : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला अखेर अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad) पुण्यात सीआयडीला शरण गेल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दरम्यान आता याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केले आहे. पोलिसांचा तपास सुरू असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. जोपर्यंत ते फासावर लटकत नाहीत तोपर्यंत पोलीस कारवाई करतील, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” बीडच्या प्रकरणात कोणालाही आम्ही सोडणार नाही, अतिशय कडक कारवाई केली जाईल. गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही. यात तपास अतिशय गतिशील करण्यात आला आहे, त्यामुळेच त्यांना शरणागती पत्करावी लागली आहे. हत्येत इतर जे आरोपी सामिल आहेत त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या टीम कामी लागल्या आहेत. कोणालाही आम्ही सोडणार नाही.

संतोष देशमुख यांच्या बंधुंशी माझे फोनवरुन बोलणे झालेले आहे. जोपर्यंत ते फासावर लटकत नाहीत तो पर्यंतची सर्व कारवाई पोलीस करतील. कोणता गुन्हा दाखल होईल? काय होईल? हे सर्व पोलीस सांगतील. जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला दिली आहे, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. कोणाचाही दबाव त्यांच्यावर चालू देणार नाही.”

धनंजय मुंडेंवरील कारवाईवर बोलताना ते पुढे म्हणाले, ” कोणी काहीही म्हणत असले तरी पोलीस जो काही पुरावा आहे, त्याच्या आधारेच कारवाई करतील. जिथे पुरावा आहे त्याला सोडले जाणार नाही. मला राजकारणात जायचे नाही, मी पहिल्यापासून सांगतो ज्याच्याविरोधात पुरावा असेल तसेच दुसऱ्या कोणाकडेही हा पुरावा असेल तर त्याने द्यावा, हत्येप्रकरणी शिक्षा होणे महत्वाचे आहे. ज्यांना राजकारण महत्वाचं आहे त्यांना त्यांचे राजकारण लखलाभ, मला यावर कोणतीही राजकीय प्रतिक्रिया द्यायची नाही ” , असे फडणवीस यांनी म्हंटले आहे.

  • Related Posts

    बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ…

    आचारसंहितेच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम; 146 गुन्हे दाखल, 126 आरोपी अटकेत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) : विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाराशिव जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *