स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रसेवादल सैनिकांचे योगदान मोलाचे एडवोकेट अजय वाघाळे पाटील.

Spread the love

धाराशिव : शरद पवार माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव व राष्ट्रसेवा दल धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चला राष्ट्रसेवादल समजून घेऊया या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती. अडवोकेट अजय वाघाळे पाटील राष्ट्र सेवादल जिल्हाध्यक्ष धाराशिव,तसेच वंचित बहुजन आघाडी महिला जिल्हध्यक्ष अनुराधा लोखंडे तसेच सहकारी रुक्मिणी ताई बनसोडे,मंगलाताई आवड हे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बुबासाहेब जाधव व महाविद्यालयाचे प्राचार्य एस बी चौधरी हे उपस्थित होते. स्वातंत्र्यपूर्व संध्येला मुलांमध्ये राष्ट्रप्रेम, देश प्रेम,देश अभिमान जागृत करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते
अडवोकेट अजय वाघाळे पाटील म्हणाले देशाच्या स्वतंत्र लढ्यात राष्ट्रसेवादल सैनिकांचे फार मोठे योगदान असून, स्वतंत्र पूर्व काळ व स्वतंत्र्या नंतर देशा मध्ये जेआंदोलने झाली
त्यामध्ये राष्ट्र सेवादल सौनिक हहारीने भाग घेत, राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची चलेजावची चळवळ असो किंवा हैदराबाद मुक्तिसंग्राम लढा,असो किंवा गोवा मुक्ती लढा. संयुक्त महाराष्ट्रची चळवळ,आणीबाणीचा संघर्ष असो अलिकडचा नामांतरचा लढा. या सर्व लढ्यामध्ये राष्ट्रसेवा दलाचे सैनिक यांचे योगदान मोठे असून याची आठवणं नवीन पिढीला व्हावी म्हणून
चला राष्ट्र सेवादल समजून घेऊया हे अभियान सुरु केल्याचे वाघाळे म्हणाले या प्रसंगी
वंचित बहुजन पार्टीच्या अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकरत्या अनुराधा लोखंडे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबर
समाज सुधारक यांचाही अभ्यास करावा व त्यांनी दिलेल्या विचार अंगीकरावा व आत्मसात करावा असे लोखंडे म्हणाले..या कार्यक्रम मध्ये शिक्षक शिक्षकेतरकर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    ‘सेवा तीर्थ’मधून ‘नागरिक देवो भव’चा संदेश; पंतप्रधानांकडून चार मोठ्या योजनांना मंजुरी

    Spread the love

    Spread the loveनवी दिल्ली : ‘सेवा तीर्थ’ या संकल्पनेतून जनकल्याणाला प्राधान्य देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब, वंचित, शेतकरी, युवा व महिला सक्षमीकरणाशी संबंधित महत्त्वाच्या योजनांवर कार्यारंभाच्या दिवशीच स्वाक्षरी केली.…

    राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    Spread the love

    Spread the loveमुंबई. -: राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे ५०…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *