धाराशिव – जैन मुनि कुलभूषण देशभूषण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,वाशी येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ध्वजवंदन सोहळा व ‘विभाजन विभीषिका स्मृतिदिन’ कार्यक्रम आज उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची प्रेरणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनातून व कौशल्य विकास,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून घेण्यात आली.
‘विभाजन विभीषिका स्मृतिदिन’ या विषयावर प्रमुख व्याख्याते श्री.जी. वाय.देशमुख यांनी १४ ऑगस्ट १९४७ च्या फाळणीतील वेदना, त्याग,मानवी हक्कांचे उल्लंघन व ऐतिहासिक पार्श्वभूमी यावर सखोल भाष्य केले.त्यांनी सांगितले की,सन २०२१ पासून हा दिवस देशभरात स्मृतिदिन म्हणून पाळला जातो.हा दिवस त्यागाचे स्मरण,मृत आत्म्यांच्या शांतीसाठी प्रार्थना,शांततेचा संदेश आणि भविष्यासाठी शिकवण देतो. आपण आज स्वतंत्र भारतात असूनही जातीयता,द्वेष आणि असहिष्णुता टाळून ऐक्य,बंधुता आणि मानवी मूल्ये जपली पाहिजेत, असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गटनिदेशक श्री. डी.आर.वाघमारे होते.प्रमुख पाहुणे संस्था नियोजन समिती सदस्य श्री. संजय कवडे,नागरिक प्रतिनिधी श्री. बाबासाहेब कवडे व माजी सैनिक श्री.ए.व्ही.बळवंत उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीमती टी.एच.शेख यांनी केले.आभार विशाल कांबळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य श्री.एस.एस. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले.