अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५ हजारांचे बक्षीस; नितीन गडकरी यांची घोषणा.

Spread the love

नवी दिल्ली – : रस्त्यावरील अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने मदत करणाऱ्यांना २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. संसदेत बोलताना गडकरी यांनी ‘राह-वीर’ योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये रुग्णालयात पोहोचवणाऱ्या नागरिकांचा सन्मान व आर्थिक प्रोत्साहन दिले जाईल, असे स्पष्ट केले.

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारचा पोलीस किंवा कायदेशीर त्रास दिला जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे हजारो प्राण वाचू शकतात, असे नमूद करत नागरिकांनी निर्भयपणे पुढे यावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.

  • Related Posts

    जनगणना -२०२७ : घर सूचीकरणासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जनगणना -२०२७ अंतर्गत घर सूचीकरण (House Listing) प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार असून, नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान…

    जिल्ह्यासाठी ८४ हजार लिटर केरोसिन मंजूर ; पहिला टँकर दाखल,पुरवठ्यास सुरुवात

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – सद्यस्थितीत भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्र शासनाने दि.१२ मार्च २०२६ रोजीच्या आदेशान्वये राज्यासाठी ३७४४ किलो लिटर केरोसिन नियतन मंजूर केले आहे.त्यानुषंगाने राज्य शासनाकडून धाराशिव…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *