अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५ हजारांचे बक्षीस; नितीन गडकरी यांची घोषणा.

Spread the love

नवी दिल्ली – : रस्त्यावरील अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने मदत करणाऱ्यांना २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. संसदेत बोलताना गडकरी यांनी ‘राह-वीर’ योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये रुग्णालयात पोहोचवणाऱ्या नागरिकांचा सन्मान व आर्थिक प्रोत्साहन दिले जाईल, असे स्पष्ट केले.

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारचा पोलीस किंवा कायदेशीर त्रास दिला जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे हजारो प्राण वाचू शकतात, असे नमूद करत नागरिकांनी निर्भयपणे पुढे यावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.

  • Related Posts

    रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तीकीचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे हस्ते प्रकाशन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – देशातील रोजगार,बेरोजगारी आणि असंघटित क्षेत्राच्या आर्थिक स्थितीबाबत अद्ययावत व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत (MoSPI) नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (Periodic…

    १ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक ;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज/मुंबई विशेष वृत्तसेवा:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *