नवी दिल्ली – : रस्त्यावरील अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने मदत करणाऱ्यांना २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. संसदेत बोलताना गडकरी यांनी ‘राह-वीर’ योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये रुग्णालयात पोहोचवणाऱ्या नागरिकांचा सन्मान व आर्थिक प्रोत्साहन दिले जाईल, असे स्पष्ट केले.
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारचा पोलीस किंवा कायदेशीर त्रास दिला जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे हजारो प्राण वाचू शकतात, असे नमूद करत नागरिकांनी निर्भयपणे पुढे यावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.